शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संस्थांत पैशापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:24 IST

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद वार्षिक अधिवेशनाचा समारोप

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था असल्या, तर त्या पैशावर कमी अन् विश्वासावर जास्त चालतात. त्यामुळे ग्राहकांचा, सभासदांचा आणि सर्व घटकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील होते.पाटील म्हणाले, कोणतीही आर्थिक संस्था अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्या संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांची आत्मियता आणि विश्वास संपादन केल्यास अधिक प्रभावी काम होऊ शकतो. बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक बॅँकांपैकी जिल्हा मध्यवर्ती बॅँक हा महत्त्वाचा दुवा आहे. या बॅँका टिकल्या तर शेतकरी टिकणार आहेत.

शेतकरी व त्यांचे अर्थकारण सांभाळण्याचे काम मध्यवर्ती बॅँका करत असतात. सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी, त्या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकच महत्त्वाची ठरत असते. सहकारी बॅँकांना नोटाबंदीच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवरही मात करून बॅँकांनी आपली वाटचाल व्यवस्थीत सुरू ठेवली आहे.यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. संजय ठिगळे, डॉ. उल्हास माळकर, बी. जी. कोरे यांच्यासह चार जिल्ह्यांतून आलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक उपस्थित होते.शेतकरी अडचणीतदिनकर पाटील म्हणाले, शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात महत्त्वाची अडचण आर्थिक नियोजन हीच असते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर अभ्यास करून मार्ग शोधावेत. आजचे तरूण शिक्षित होत असले तरी, त्यांना व्यवहारज्ञान असेलच असे नसल्याने, त्यावरही आता तज्ज्ञांना मोठे काम करावे लागणार आहे.सांगली येथे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशन समारोप समारंभात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.