शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आर्थिक संस्थांत पैशापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:24 IST

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद वार्षिक अधिवेशनाचा समारोप

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था असल्या, तर त्या पैशावर कमी अन् विश्वासावर जास्त चालतात. त्यामुळे ग्राहकांचा, सभासदांचा आणि सर्व घटकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील होते.पाटील म्हणाले, कोणतीही आर्थिक संस्था अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्या संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांची आत्मियता आणि विश्वास संपादन केल्यास अधिक प्रभावी काम होऊ शकतो. बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक बॅँकांपैकी जिल्हा मध्यवर्ती बॅँक हा महत्त्वाचा दुवा आहे. या बॅँका टिकल्या तर शेतकरी टिकणार आहेत.

शेतकरी व त्यांचे अर्थकारण सांभाळण्याचे काम मध्यवर्ती बॅँका करत असतात. सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी, त्या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकच महत्त्वाची ठरत असते. सहकारी बॅँकांना नोटाबंदीच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवरही मात करून बॅँकांनी आपली वाटचाल व्यवस्थीत सुरू ठेवली आहे.यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. संजय ठिगळे, डॉ. उल्हास माळकर, बी. जी. कोरे यांच्यासह चार जिल्ह्यांतून आलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक उपस्थित होते.शेतकरी अडचणीतदिनकर पाटील म्हणाले, शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात महत्त्वाची अडचण आर्थिक नियोजन हीच असते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर अभ्यास करून मार्ग शोधावेत. आजचे तरूण शिक्षित होत असले तरी, त्यांना व्यवहारज्ञान असेलच असे नसल्याने, त्यावरही आता तज्ज्ञांना मोठे काम करावे लागणार आहे.सांगली येथे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशन समारोप समारंभात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.