शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

आर्थिक संस्थांत पैशापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:24 IST

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद वार्षिक अधिवेशनाचा समारोप

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था असल्या, तर त्या पैशावर कमी अन् विश्वासावर जास्त चालतात. त्यामुळे ग्राहकांचा, सभासदांचा आणि सर्व घटकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील होते.पाटील म्हणाले, कोणतीही आर्थिक संस्था अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्या संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांची आत्मियता आणि विश्वास संपादन केल्यास अधिक प्रभावी काम होऊ शकतो. बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक बॅँकांपैकी जिल्हा मध्यवर्ती बॅँक हा महत्त्वाचा दुवा आहे. या बॅँका टिकल्या तर शेतकरी टिकणार आहेत.

शेतकरी व त्यांचे अर्थकारण सांभाळण्याचे काम मध्यवर्ती बॅँका करत असतात. सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी, त्या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकच महत्त्वाची ठरत असते. सहकारी बॅँकांना नोटाबंदीच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवरही मात करून बॅँकांनी आपली वाटचाल व्यवस्थीत सुरू ठेवली आहे.यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. संजय ठिगळे, डॉ. उल्हास माळकर, बी. जी. कोरे यांच्यासह चार जिल्ह्यांतून आलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक उपस्थित होते.शेतकरी अडचणीतदिनकर पाटील म्हणाले, शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात महत्त्वाची अडचण आर्थिक नियोजन हीच असते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर अभ्यास करून मार्ग शोधावेत. आजचे तरूण शिक्षित होत असले तरी, त्यांना व्यवहारज्ञान असेलच असे नसल्याने, त्यावरही आता तज्ज्ञांना मोठे काम करावे लागणार आहे.सांगली येथे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशन समारोप समारंभात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.