शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

ग्रामीण भागातच खरे वाङ्मय

By admin | Updated: January 15, 2015 23:20 IST

नरेंद्र चपळगावकर : औदुंबर येथील साहित्य संमेलनात प्रतिपादन

अंकलखोप : ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातच खरे वाङ्मय दिसून येते, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सदानंद साहित्य मंडळाच्या औदुंबर येथील ७२ व्या साहित्य संमेलनात केले. ते अध्यक्षस्थानी होते. चपळगावकर म्हणाले की, जात्यावरची गीते संपली, कारण आता घरा-घरात जाती राहिलीच नाहीत. त्यामुळे जीवनाचे संगीतच संपून गेले आहे. जीवनात विसंगत गोष्टीच समोर येत आहेत. देशातील विस्मृतीत गेलेल्या व्यक्ती पुढे याव्यात यासाठी लेखकांचे लेखन झाले पाहिजे. माणसाचे चारित्र्य घटनांतून जन्माला येते. ते पुढे मांडण्यासाठीच वाङ्मयाचा उद्देश असला पाहिजे.यावेळी त्यांनी जुने कवी, लेखकांचा परामर्श घेऊन त्यामध्ये किती ताकद होती याची उदाहरणे दिली. माणसाच्या मनातील चांगुलपणा वाङ्मयामध्ये मिळतो. त्यातच जीवनाचा अर्थ कळतो त्यासाठी वाङ्मय समृध्द झाले पाहिजे.यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे भाषण झाले. सुरुवातीस सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दयानंद पाडलोस्कर यांच्या ‘जन्म दिलेल्या मुलाकडे पाहात’ या काव्यसंग्रहाला सुधांशू पुरस्कार, तर तुषार कुलकर्णी यांच्या ‘ठिपका’ या काव्यसंग्रहाला सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी हरिभाऊ पुदाले यांच्या ‘गीत मयुरा’ या काव्यसंग्रहाचे व डॉ. उमेश दत्ता कळेकर, शिरोळ यांच्या ‘फिनिक्स’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.माजी कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे व शेतीनिष्ठ शेतकरी रवी पाटील व प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापूसाहेब पुजारी, अविनाश सप्रे, श्रीनिवास कुलकर्णी, डॉ. सुधीर रसाळ, कवी वसंत पाटील, उपसरपंच सौ. श्वेता बिरनाळे, उपसरपंच विकास गावडे, रवी पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब पवार, सौ. वैशाली पाटील, पत्रकार वसंत आपटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वासुदेव जोशी यांनी केले. चपळगावकर यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन माजी कुलगुरु द. ना. धनागरे यांचा सत्कार केला.(वार्ताहर)कविसंमेलनात उत्साह औदुंबरच्या साहित्य संमेलनाने अनेक नवोदितांना लिहिते व बोलते केले आहे, असे प्रतिपादन कवी वसंत पाटील (पणुंब्रे वारुण) यांनी कविसंमेलनात केले. ‘कवी सुधांशू व्यासपीठा’वर सलग तीन तास कविसंमेलन रंगले होते. कवींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुरुषोत्तम जोशी यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. सुभाष कवडे यांनी केले. आभार आदित्य जोशी यांनी मानले.