शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

ग्रामीण भागातच खरे वाङ्मय

By admin | Updated: January 15, 2015 23:20 IST

नरेंद्र चपळगावकर : औदुंबर येथील साहित्य संमेलनात प्रतिपादन

अंकलखोप : ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातच खरे वाङ्मय दिसून येते, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सदानंद साहित्य मंडळाच्या औदुंबर येथील ७२ व्या साहित्य संमेलनात केले. ते अध्यक्षस्थानी होते. चपळगावकर म्हणाले की, जात्यावरची गीते संपली, कारण आता घरा-घरात जाती राहिलीच नाहीत. त्यामुळे जीवनाचे संगीतच संपून गेले आहे. जीवनात विसंगत गोष्टीच समोर येत आहेत. देशातील विस्मृतीत गेलेल्या व्यक्ती पुढे याव्यात यासाठी लेखकांचे लेखन झाले पाहिजे. माणसाचे चारित्र्य घटनांतून जन्माला येते. ते पुढे मांडण्यासाठीच वाङ्मयाचा उद्देश असला पाहिजे.यावेळी त्यांनी जुने कवी, लेखकांचा परामर्श घेऊन त्यामध्ये किती ताकद होती याची उदाहरणे दिली. माणसाच्या मनातील चांगुलपणा वाङ्मयामध्ये मिळतो. त्यातच जीवनाचा अर्थ कळतो त्यासाठी वाङ्मय समृध्द झाले पाहिजे.यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे भाषण झाले. सुरुवातीस सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दयानंद पाडलोस्कर यांच्या ‘जन्म दिलेल्या मुलाकडे पाहात’ या काव्यसंग्रहाला सुधांशू पुरस्कार, तर तुषार कुलकर्णी यांच्या ‘ठिपका’ या काव्यसंग्रहाला सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी हरिभाऊ पुदाले यांच्या ‘गीत मयुरा’ या काव्यसंग्रहाचे व डॉ. उमेश दत्ता कळेकर, शिरोळ यांच्या ‘फिनिक्स’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.माजी कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे व शेतीनिष्ठ शेतकरी रवी पाटील व प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापूसाहेब पुजारी, अविनाश सप्रे, श्रीनिवास कुलकर्णी, डॉ. सुधीर रसाळ, कवी वसंत पाटील, उपसरपंच सौ. श्वेता बिरनाळे, उपसरपंच विकास गावडे, रवी पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब पवार, सौ. वैशाली पाटील, पत्रकार वसंत आपटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वासुदेव जोशी यांनी केले. चपळगावकर यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन माजी कुलगुरु द. ना. धनागरे यांचा सत्कार केला.(वार्ताहर)कविसंमेलनात उत्साह औदुंबरच्या साहित्य संमेलनाने अनेक नवोदितांना लिहिते व बोलते केले आहे, असे प्रतिपादन कवी वसंत पाटील (पणुंब्रे वारुण) यांनी कविसंमेलनात केले. ‘कवी सुधांशू व्यासपीठा’वर सलग तीन तास कविसंमेलन रंगले होते. कवींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुरुषोत्तम जोशी यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. सुभाष कवडे यांनी केले. आभार आदित्य जोशी यांनी मानले.