शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

निर्यातक्षम द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात

By admin | Updated: October 8, 2016 00:36 IST

खानापूर घाटमाथ्याला पावसाची हुलकावणी : शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

पांडुरंग डोंगरे --खानापूर -पावसाअभावी खानापूर पूर्व भागातील शेतकऱ्यांची फारच केविलवाणी अवस्था झाली आहे. एकही मोठा पाऊस न झाल्याने घाटमाथ्यावरील सर्वच तलाव कोरडे ठणठणीत आहेत. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आगामी रब्बी, द्राक्ष हंगाम पार पडणार का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याचा सर्वाधिक फटका पळशी परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना बसला आहे.राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. सर्व मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मात्र याला खानापूर तालुक्यातील पूर्वभाग अपवाद ठरला आहे. वळीव पाऊस नाही व परतीचाही पाऊस नाही. मोसमी पाऊसही जेमतेम झाला आहे. अशा विचित्र स्थितीत खानापूर घाटमाथा सापडला आहे. परिणामी, घाटमाथ्यावरील सर्व पाझर तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सुलतानगादे साठवण तलावात एक थेंबही पाणी नाही. गेल्या दोन वर्षांपासून अग्रणी नदीवर जलयुक्त शिवार तसेच शासनाच्या अन्य योजनांमधून बांधलेले बलवडी (खा.), बेणापूर, सुलतानगादे, खापरगादे, करंजे येथील सर्व बंधारे पावसाअभावी कोरडे आहेत. सर्व ओढे, नाले कोरडेच राहिल्याने कूपनलिकांसह विहिरींची पाणी पातळीही खालावली आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम द्राक्षबागांना बसला आहे. सध्या द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू आहे. छाटणीपासूनच पाणीटंचाई सुरू झाल्याने द्राक्षबागांची छाटणी घ्यायची की नाही?, असा प्रश्न द्राक्ष बागायतदारांना पडला आहे. खानापूर घाटमाथ्यावर द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र पळशी येथे आहे. पळशीतील द्राक्षशेती १०० टक्के निर्यातक्षम स्वरूपाची आहे. या परिसरात ३०० एकरापेक्षा जास्त क्षेत्र असून, सर्व शेतकऱ्यांना पाण्याचाच प्रश्न भेडसावत आहे.गतवर्षीचा हंगाम कसातरी पार पडला. २०१३ व २०१४ ला गारपिटीने, तर २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसाने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून टॅँकरने पाणी घालून येथील द्राक्षबागा जगविल्या आहेत. यावर्षीही पाणीटंचाई जाणवू लागल्याने टॅँकरशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. टॅँकरसाठी पाणी कुठून आणायचे?, असा प्रश्नही आहे. हंगाम कसे पार पडणार, की दुष्काळाचा सामना करावा लागणार, अशी परिस्थिती घाटमाथ्यावर निर्माण झाली आहे.हे व्हायला हवे...खानापूर घाटमाथ्यास कायमस्वरूपी पाण्याची गरज आहे. त्यासाठी टेंभूच्या पाचव्या टप्प्याचे काम लवकर सुरू करून पाणी अग्रणी नदी व खानापूर ओढ्यात टाकण्याची आवश्यकतापळशी येथील द्राक्षबागा तीन वर्षांपासून टॅँकरने पाणी देऊन जगविल्या. यंदाही पाणी टंचाई असल्याने टॅँकरसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची गरजटेंभूच्या जकाईदरा (मानेवाडी) येथील कालव्यामधून पाणी उचलण्यासाठी पळशी येथील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीचा विचार व्हावादुष्काळग्रस्त पळशी परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांनी पाण्यासाठी गट शेती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला शासनाने सहकार्य करण्याची मागणी