शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

निर्यातक्षम द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात

By admin | Updated: October 8, 2016 00:36 IST

खानापूर घाटमाथ्याला पावसाची हुलकावणी : शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

पांडुरंग डोंगरे --खानापूर -पावसाअभावी खानापूर पूर्व भागातील शेतकऱ्यांची फारच केविलवाणी अवस्था झाली आहे. एकही मोठा पाऊस न झाल्याने घाटमाथ्यावरील सर्वच तलाव कोरडे ठणठणीत आहेत. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आगामी रब्बी, द्राक्ष हंगाम पार पडणार का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याचा सर्वाधिक फटका पळशी परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना बसला आहे.राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. सर्व मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मात्र याला खानापूर तालुक्यातील पूर्वभाग अपवाद ठरला आहे. वळीव पाऊस नाही व परतीचाही पाऊस नाही. मोसमी पाऊसही जेमतेम झाला आहे. अशा विचित्र स्थितीत खानापूर घाटमाथा सापडला आहे. परिणामी, घाटमाथ्यावरील सर्व पाझर तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सुलतानगादे साठवण तलावात एक थेंबही पाणी नाही. गेल्या दोन वर्षांपासून अग्रणी नदीवर जलयुक्त शिवार तसेच शासनाच्या अन्य योजनांमधून बांधलेले बलवडी (खा.), बेणापूर, सुलतानगादे, खापरगादे, करंजे येथील सर्व बंधारे पावसाअभावी कोरडे आहेत. सर्व ओढे, नाले कोरडेच राहिल्याने कूपनलिकांसह विहिरींची पाणी पातळीही खालावली आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम द्राक्षबागांना बसला आहे. सध्या द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू आहे. छाटणीपासूनच पाणीटंचाई सुरू झाल्याने द्राक्षबागांची छाटणी घ्यायची की नाही?, असा प्रश्न द्राक्ष बागायतदारांना पडला आहे. खानापूर घाटमाथ्यावर द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र पळशी येथे आहे. पळशीतील द्राक्षशेती १०० टक्के निर्यातक्षम स्वरूपाची आहे. या परिसरात ३०० एकरापेक्षा जास्त क्षेत्र असून, सर्व शेतकऱ्यांना पाण्याचाच प्रश्न भेडसावत आहे.गतवर्षीचा हंगाम कसातरी पार पडला. २०१३ व २०१४ ला गारपिटीने, तर २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसाने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून टॅँकरने पाणी घालून येथील द्राक्षबागा जगविल्या आहेत. यावर्षीही पाणीटंचाई जाणवू लागल्याने टॅँकरशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. टॅँकरसाठी पाणी कुठून आणायचे?, असा प्रश्नही आहे. हंगाम कसे पार पडणार, की दुष्काळाचा सामना करावा लागणार, अशी परिस्थिती घाटमाथ्यावर निर्माण झाली आहे.हे व्हायला हवे...खानापूर घाटमाथ्यास कायमस्वरूपी पाण्याची गरज आहे. त्यासाठी टेंभूच्या पाचव्या टप्प्याचे काम लवकर सुरू करून पाणी अग्रणी नदी व खानापूर ओढ्यात टाकण्याची आवश्यकतापळशी येथील द्राक्षबागा तीन वर्षांपासून टॅँकरने पाणी देऊन जगविल्या. यंदाही पाणी टंचाई असल्याने टॅँकरसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची गरजटेंभूच्या जकाईदरा (मानेवाडी) येथील कालव्यामधून पाणी उचलण्यासाठी पळशी येथील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीचा विचार व्हावादुष्काळग्रस्त पळशी परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांनी पाण्यासाठी गट शेती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला शासनाने सहकार्य करण्याची मागणी