शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:11 IST

मिरजेत तयारी : नायकवडी गटाची प्रतिष्ठा पणाला

मिरज : मिरजेत महापालिकेच्या प्रभाग ३० मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या कन्या नाजिया शेख-नायकवडी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने नायकवडी गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रभाग ३० मध्ये अपवाद वगळता इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व राहिले आहे. जात प्रमाणपत्राबाबत तक्रारीमुळे आयेशा नायकवडी यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने गतवेळी इच्छुक असलेले शमशोद्दीन सय्यद यांच्या पत्नी सायराबानू सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. दर्गा परिसरातील या प्रभागात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे. सुमारे ७० टक्के मुस्लिम मतदारात मतांची विभागणी होणार असल्याने शुभांगी रुईकर यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने लाभ उठविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने येथे उमेदवार दिलेला नाही. भाजप, शिवसेनेची युती असली, तरी आमदार सुरेश खाडे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी साजीद पठाण यांची निवड रद्द झाल्यानंतर इद्रिस नायकवडी यांच्याविरोधात चांगली मते घेतली होती. शह-काटशहच्या राजकारणामुळे मिरजेत दर्गा परिसर नेहमीच चर्चेत आहे. पठाण आणि नायकवडी यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. राष्ट्रवादीने नायकवडी विरोधकांना एकत्र करुन निवडणुकीत रंग भरला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केले असले तरी राजकीय डावपेचात नायकवडी तरबेज आहेत. त्यामुळे नायकवडी यांना राष्ट्रवादी कशी टक्कर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इद्रिस नायकवडी यांचे अस्तित्व या पोटनिवडणुकीत पणाला लागले आहे. सत्ताधारी महापालिकेतील पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसत असले तरी, मिरज पॅटर्नमुळे निवडणूक समीकरणे बदलणार आहेत. शहरात एकाच प्रभागातील पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांची नेतेमंडळी उतरणार असल्याने पोटनिवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)जयंत पाटील गटाने कंबर कसलीराष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी नायकवडी घराण्यातील सदस्य निवडून येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तरीही नायकवडी कुटुंबातील तीन सदस्य निवडून आले. त्यानंतरच्या काळात नायकवडी व जयंत पाटील यांच्यात समेट झाला. मात्र आता पोटनिवडणुकीत नायकवडी गटाच्या पाडावासाठी जयंत पाटील गटाने पुन्हा कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे नेते व नायकवडी विरोधकांनी सायराबानू सय्यद यांना बळ दिले आहे. इलियास नायकवडी राष्ट्रवादीचे पदाधिकारी असले तरी प्रभागात ते घरातील उमेदवारासोबत राहणार असल्याचे सांगितले जाते.