शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

गाव बंदमुळे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST

सांगली : कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. यामुळे आर्थिक ...

सांगली : कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण थंडावले आहे.

--------------------

खानापूर तालुक्यात बंधाऱ्यांमुळे दिलासा

खानापूर : तालुक्यातील विविध गावांमधील ओढ्यांवर व अग्रणी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यांमुळे सध्या पाण्याची चांगली उपलब्धता झाली आहे. अग्रणी नदीवरील बंधारे टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खानापुरातील तलाव भरला आहे, तर सुलतानगादे येथील तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे नागरिकांना डिसेंबरपर्यंत तरी पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे.

--------------------

रस्त्याचे काम रखडले

पुनवत : तालुक्यात सध्या रत्नागिरी-गुहाघर मार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील शिराळा ते पावनेवाडी येथील काम रखडले आहे. यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून जाताना कसरत करावी लागत आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

-----------

आषाढातही वरुणराजाची वक्रदृष्टी

पुनवत : पावसाचे आगार असणाऱ्या शिराळा तालुक्यात सध्या पावसाने दडी मारली आहे. आषाढ महिन्यात या भागात मुसळधार पाऊस कोसळत असतो. मात्र यंदा वरुणराजाने वक्रदृष्टी केली आहे. वारणा नदीतही पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

-------------

काटेरी झुडपांमुळे वाहतुकीस धोका

संख : जत तालुक्यातील अनेक रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. विशेषत: मोठ्या वळणावर झुडपांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यामुळे ही झुडपे काढण्यात यावीत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

---------------