शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

इस्लामपुरात वाहतूक कोंडी आवाक्याबाहेर

By admin | Updated: April 28, 2015 00:21 IST

नगराध्यक्षच हतबल : विरोधी पक्षनेत्यांकडून राजीनाम्याची मागणी

अशोक पाटील- इस्लामपूर --इस्लामपूर शहरातील मुख्य चौका—चौकात वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. विशेषत: रविवारी व गुरुवारी या आठवडी बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोरील रस्त्यावरच बाजारात येणारे व्यापारी, ग्राहक आपली वाहने लावतात. या वाहनांवर कोणीही कारवाई करत नाही. उलट व्यापारीच पालिका पदाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दम देतात. वाहतूक समस्येची जबाबदारी नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव घेत नाहीत. तसेच नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हात झटकून रिकामे होतात. या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी केली आहे.शहरातील वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन मांडलेल्या साहित्यामुळे चौका-चौकात वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव यांनी पुढाकार घेऊन दोन बैठका घेतल्या. तरीसुध्दा वाहतुकीचे नियोजन झाले नाही. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही, ही जबाबदारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचीही आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार द्यावेत, मग बघा माझ्या कामाची पध्दत, असे स्पष्ट करुन त्यांनी आपली जबाबदारी झटकली.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी तर, बघू, करतो, पाहू असे जुजबी उत्तर देत वाहतुकीचे नियोजन खंडेराव जाधव आणि नियोजन समितीतील सदस्यांवर आहे, असे स्पष्ट करीत स्मितहास्य करीत आपली जबाबदारी झटकली. सूर्यवंशी यांना नगराध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी शहरातील नावाजण्यासारखे एकही काम केले नसल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.गुरुवारी आणि रविवारी या आठवडा बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोर जीवघेणी वाहतुकीची कोंडी होत असते. याठिकाणी दोन वाहतूक पोलीस नेमणुकीस असतात. परंतु त्यांच्याकडून येथील वाहनांची व्यवस्था लावणे शक्य होत नाही. रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी अवाच्या सवा भाडे बेकायदेशीरपणे उकळतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.वाहतूक नियोजनासाठी बैठक घेऊ..!वाहतुकीसंबंधात पालिकेच्या सभागृहात दोन बैठका होऊनही, परिस्थिती जैसे थे आहे. नेहमीप्रमाणेच प्रत्येक महत्त्वाच्या चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बनली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना विचारले असता, पुन्हा बैठका घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे जुजबी उत्तर देऊन त्यांनीही आपली जबाबदारी झटकली.वाहतूक नियोजन खर्चाला मंजुरी देण्यासाठी आम्ही विरोध केला होता. सभागृहाने मात्र त्याला मान्यता दिली. खर्च करुनही वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि सभापती खंडेराव जाधव यांनी राजीनामे द्यावेत.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.