शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

इस्लामपुरात वाहतूक कोंडी आवाक्याबाहेर

By admin | Updated: April 28, 2015 00:21 IST

नगराध्यक्षच हतबल : विरोधी पक्षनेत्यांकडून राजीनाम्याची मागणी

अशोक पाटील- इस्लामपूर --इस्लामपूर शहरातील मुख्य चौका—चौकात वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. विशेषत: रविवारी व गुरुवारी या आठवडी बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोरील रस्त्यावरच बाजारात येणारे व्यापारी, ग्राहक आपली वाहने लावतात. या वाहनांवर कोणीही कारवाई करत नाही. उलट व्यापारीच पालिका पदाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दम देतात. वाहतूक समस्येची जबाबदारी नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव घेत नाहीत. तसेच नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हात झटकून रिकामे होतात. या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी केली आहे.शहरातील वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन मांडलेल्या साहित्यामुळे चौका-चौकात वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव यांनी पुढाकार घेऊन दोन बैठका घेतल्या. तरीसुध्दा वाहतुकीचे नियोजन झाले नाही. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही, ही जबाबदारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचीही आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार द्यावेत, मग बघा माझ्या कामाची पध्दत, असे स्पष्ट करुन त्यांनी आपली जबाबदारी झटकली.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी तर, बघू, करतो, पाहू असे जुजबी उत्तर देत वाहतुकीचे नियोजन खंडेराव जाधव आणि नियोजन समितीतील सदस्यांवर आहे, असे स्पष्ट करीत स्मितहास्य करीत आपली जबाबदारी झटकली. सूर्यवंशी यांना नगराध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी शहरातील नावाजण्यासारखे एकही काम केले नसल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.गुरुवारी आणि रविवारी या आठवडा बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोर जीवघेणी वाहतुकीची कोंडी होत असते. याठिकाणी दोन वाहतूक पोलीस नेमणुकीस असतात. परंतु त्यांच्याकडून येथील वाहनांची व्यवस्था लावणे शक्य होत नाही. रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी अवाच्या सवा भाडे बेकायदेशीरपणे उकळतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.वाहतूक नियोजनासाठी बैठक घेऊ..!वाहतुकीसंबंधात पालिकेच्या सभागृहात दोन बैठका होऊनही, परिस्थिती जैसे थे आहे. नेहमीप्रमाणेच प्रत्येक महत्त्वाच्या चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बनली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना विचारले असता, पुन्हा बैठका घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे जुजबी उत्तर देऊन त्यांनीही आपली जबाबदारी झटकली.वाहतूक नियोजन खर्चाला मंजुरी देण्यासाठी आम्ही विरोध केला होता. सभागृहाने मात्र त्याला मान्यता दिली. खर्च करुनही वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि सभापती खंडेराव जाधव यांनी राजीनामे द्यावेत.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.