शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जत शहरात वाहतूक कोंडीची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत शहर व विजापूर ते गुहागर राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत शहर व विजापूर ते गुहागर राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु प्रशासकीय पातळीवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. यामुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जत शहरातील महाराणा प्रताप चौक, सोलनकर चौक, बसवेश्वर चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल ते जयहिंद चौक ही जत शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथील रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते बाजूला बसलेले असतात. याशिवाय हातगाडीवाले, फेरीवाले व इतर विक्रेतेही सतत फिरत असतात. अशातच किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांचा माल दुकानात उतरण्यासाठी अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

राजकीय दबाव व सतत हस्तक्षेप होत असल्याने वाहतूक पोलीस कारवाईकडे कानाडोळा करत आहेत. याशिवाय नागरिक मिळेल त्या जागेवर वाहने पार्किंग करून खरेदीसाठी जातात. यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे.

विजापूर ते गुहागर राज्य मार्गावरील सोलनकर चौक ते बसवेश्वर चौकदरम्यानचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूलाही वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. जत बसस्थानकासमोरील बाजूस खासगी प्रवासी वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करून प्रवासी भरतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते.

चाैकट

जत शहरासह राज्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस व जत नगरपालिकेने स्वतंत्र आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. जत शहरात पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केली आहे.

फोटो-०३जत०१

फोटो ओळ : जत शहरात रस्त्याकडेला भाजीपाला विक्री केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.