बाजार पेठेतील अरुंद रस्ता व त्या रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या बुधवारच्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोनहिरा परिसरात देवराष्ट्रे गाव अनेक लहान खेडयांना जोडले आहे. त्यामुळे बाजारादिवशी या बाजारात भाजीपाला खरेदी-विक्री करण्यासाठी मोठी गर्दी होती. अन्य गावांतून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने सर्व वाहने रस्त्यावरच लावली जातात. शिवाजी चौक ते कुंभारगावपर्यंत असणारी बाजार पेठ बाजारादिवशी गजबजलेली असते. त्यामुळे शिवाजी चौक ते रामापूर व वांगी रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन अर्धा तास वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे कुंडल, सांगली, ताकारी, वांगी, सोनहिरा कारखान्याकडे जाणारी वाहतूक थांबली जाते.
पर्यायी व्यवस्था
गावाचा आठवडी बाजार गावाशेजारी असणाऱ्या गावतळ्यात भरविण्यास चालू केल्यास गावातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.