शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

सांगली, मिरजेतील व्यापारी आज दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

सांगली : लॉकडाऊनविरोधात संताप व्यक्त करीत सांगली, मिरजेतील व्यापारी शुक्रवारी (दि.२३ जुलै) दुकाने उघडणार आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचे खासदार, ...

सांगली : लॉकडाऊनविरोधात संताप व्यक्त करीत सांगली, मिरजेतील व्यापारी शुक्रवारी (दि.२३ जुलै) दुकाने उघडणार आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्तेही उतरणार असल्याने यावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

सांगली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यापार गेल्या शंभर दिवसांपासून बंद आहे. गेली महिनाभर व्यापारी सातत्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी करीत आहेत. प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्येच्या कारणावरून व्यापाऱ्यांची मागणी फेटाळत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनात सर्व व्यापारी संघटना उतरणार असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

व्यापाऱ्यांनी एकीकडे आंदोलनाची तयारी केली असताना गुरुवारी पोलिसांनी बाजारातील काही व्यापाऱ्यांना दुकाने न उघडण्याबाबत सूचना दिल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलीस व जिल्हा प्रशासन व्यापाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केला आहे.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहे. बाजारपेठांमध्ये दुकानांबाहेर आम्ही उभे राहू, असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.

चौकट

पुराची टांगती तलवार

एकीकडे दुकाने उघडण्याचे आंदोलन होत असतानाच सांगलीतील व्यापारी पेठांवर पुराची टांगती तलवार लटकत आहे. शुक्रवारी सांगलीची पाणीपातळी ३५ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुहेरी चिंता सतावत आहे.

चौकट

नुकसानीस जिल्हाधिकारी जबाबदार - समीर शहा

समीर शहा म्हणाले की, संभाव्य पूरस्थितीची कल्पना देऊन तळघरातील माल स्थलांतरी करण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने या मागणीस कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता पूरस्थिती निर्माण झाली असताना अचानक इतका माल स्थलांतरित करणे शक्य नाही. पुरात जर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तर त्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यावर असेल.

चौकट

संघर्ष होण्याची शक्यता

एकीकडे प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश दिले असताना व्यापारी आक्रमक भूमिकेत दुकाने सुरू करीत आहेत. त्यात भाजपही सहभागी झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यावरून व्यापारी, राजकीय कार्यकर्ते व पोलिसांत संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.