शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सांगली, मिरजेतील व्यापारी आज दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

सांगली : लॉकडाऊनविरोधात संताप व्यक्त करीत सांगली, मिरजेतील व्यापारी शुक्रवारी (दि.२३ जुलै) दुकाने उघडणार आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचे खासदार, ...

सांगली : लॉकडाऊनविरोधात संताप व्यक्त करीत सांगली, मिरजेतील व्यापारी शुक्रवारी (दि.२३ जुलै) दुकाने उघडणार आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्तेही उतरणार असल्याने यावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

सांगली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यापार गेल्या शंभर दिवसांपासून बंद आहे. गेली महिनाभर व्यापारी सातत्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी करीत आहेत. प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्येच्या कारणावरून व्यापाऱ्यांची मागणी फेटाळत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनात सर्व व्यापारी संघटना उतरणार असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

व्यापाऱ्यांनी एकीकडे आंदोलनाची तयारी केली असताना गुरुवारी पोलिसांनी बाजारातील काही व्यापाऱ्यांना दुकाने न उघडण्याबाबत सूचना दिल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलीस व जिल्हा प्रशासन व्यापाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केला आहे.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहे. बाजारपेठांमध्ये दुकानांबाहेर आम्ही उभे राहू, असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.

चौकट

पुराची टांगती तलवार

एकीकडे दुकाने उघडण्याचे आंदोलन होत असतानाच सांगलीतील व्यापारी पेठांवर पुराची टांगती तलवार लटकत आहे. शुक्रवारी सांगलीची पाणीपातळी ३५ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुहेरी चिंता सतावत आहे.

चौकट

नुकसानीस जिल्हाधिकारी जबाबदार - समीर शहा

समीर शहा म्हणाले की, संभाव्य पूरस्थितीची कल्पना देऊन तळघरातील माल स्थलांतरी करण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने या मागणीस कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता पूरस्थिती निर्माण झाली असताना अचानक इतका माल स्थलांतरित करणे शक्य नाही. पुरात जर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तर त्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यावर असेल.

चौकट

संघर्ष होण्याची शक्यता

एकीकडे प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश दिले असताना व्यापारी आक्रमक भूमिकेत दुकाने सुरू करीत आहेत. त्यात भाजपही सहभागी झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यावरून व्यापारी, राजकीय कार्यकर्ते व पोलिसांत संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.