शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शहरातील व्यापार दिवसाआड सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक ...

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक दिवस अत्यावश्यक सेवा तर दुसऱ्या दिवशी इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.

समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, राज्य सरकारने निश्चित केलेल्या तिसऱ्या स्तरातून सांगली जिल्हा बाहेर पडलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्याही जैसे थेच आहे. त्यामुळे सध्याच्या कडक निर्बंधांचा फारसा उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील व्यापार शंभर टक्के उद्‌ध्वस्त झाला आहे. व्यापाऱ्यांवरील कर्जाचे व्याज, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्था कर, कामगारांचे पगार सुरूच आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कडक लाॅकडाऊन करा अथवा सारेच व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत एक दिवस अत्यावश्यक सेवा व एक दिवस इतर व्यापार सुरू करण्यात यावा. जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवावी, व्यापाऱ्यांची वीजबिल, कर्जाचे व्याज, स्थानिक स्वराज्य संस्था कर माफ करावेत, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अमर पडळकर, अश्रफ वांकर, आसीफ बावा, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, आशिष कोरी, महेश पाटील, प्रशांत भोसले, राहुल पाटील, प्रदीप कांबळे, कामरान सय्यद उपस्थित होते.