शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीकरांना गढूळ पाणी

By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST

नेते गायब, ग्रामस्थ संतप्त : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

अविनाश बाड - आटपाडी येथे गेल्या आठवड्यात पडलेल्या थोड्या पावसाने तलावातील पाणी गढूळ झाले आहे. तेच पाणी आटपाडीतील ३२ हजार ७८० नागरिकांना चक्क पिण्यासाठी पुरवठा केले जात आहे. वीज कंपनीने आटपाडीकरांना १६ कोटींच्या योजनेस वीज कनेक्शन न देऊन वेठीस धरले आहे. तेव्हा नेते हो, आम्ही अजून किती दिवस प्यायचे गढूळ पाणी, असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.आटपाडी ग्रामपंचायतीच्या कृपेनेच नागरिकांना ८ ते १० दिवसांतून एकदा पाणी मिळते. आटपाडीच्या तलावात गेले वर्षभर साठवून ठेवलेले पाणी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गढूळ झाले आहे आणि हेच पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे. तसेच या पाण्याला तीव्र दुर्गंधीही येत आहे. भांड्यात साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये अळ्या होत आहेत. या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील पाण्याचे फिल्टर बंद पडून नादुरुस्त झाले आहेत. फिल्टरला वॉरंटी असल्यामुळे दुरुस्तीसाठी कंपनीकडे गेले असता, आम्ही पिण्याचं पाणी शुद्ध करतो, गटारीचे नाही, अशी अजब उत्तरे नागरिकांना ऐकून घ्यावी लागत आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पासह पूर्ण असलेल्या भारत निर्माण योजनेतून केलेली नवी पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन न दिल्यामुळेच सुरू होऊ शकत नाही.थकबाकीतील अंशत: रक्कम भरण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे यांनी एकूण साडेसात लाख रुपयांचा स्वीय निधी देण्यासाठी पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेच्या लाल फितीतून निधीच्या या फायली गेल्या आठवड्याभरापासून या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत आहेत.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही रक्कम देण्याची हमी जबाबदार पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आणि त्याची कारवाई सुरू झाल्यानंतरही वीज वितरण कंपनीचे अधिकारी जागचे हलायला तयार नाहीत. अजूनही ही रक्कम जमा केली जाईल, यावर या कर्तव्यदक्ष (?) अधिकाऱ्यांचा विश्वास का बसत नाही? या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू आहेत, हे त्यांना दिसत नाही का, असा संतापजनक सवाल होत आहे.प्रशासन, अधिकारी याबाबत कमालीची बेफिकिरी दाखवित असताना, या भागातील नेते काय करीत आहेत? असा संतप्त सवालही नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि अनेकवेळा आटपाडीची बारामती, अकलूज, इस्लामपूर करू म्हणणारे नेते आता कुठे आहेत? विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणारे नेते आता का गप्प आहेत? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.शहाणपण दे गा देवा!सध्या आटपाडीत गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. दररोज सकाळी-सायंकाळी आरतीसाठी भावी नगरसेवक म्हणून अनेकजणांची नावे पुकारली जात आहेत. अजून नगरपंचायत व्हायची आहे. काही जणांनी तर मनातल्या मनात नगराध्यक्ष पदाची खुर्चीही पटकावली आहे. अण्णा-बापू युवा शक्तीने नुकतीच झोकात दहीहंडी करुन डीजेच्या तालावर शेकडो तरुणांना नाचविले. पण यातले कुणीच आता, आटपाडीकर दररोज गढूळ पाणी पिऊन त्रस्त असतानाही काही करताना दिसून येत नाहीत.