शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

साखर कारखान्यांच्या फडात टोलवाटोलवी

By admin | Updated: September 28, 2015 23:49 IST

ऊस उत्पादक वाऱ्यावर : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि दुर्लक्ष; गळीत हंगामाचे भवितव्य अधांतरीच

अशोक पाटील - इस्लामपूर -मंत्रीपदासाठी भाजपचे उंबरठे झिजविणाऱ्या शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत नाटकी असल्याचा आरोप करून, उसाला दर मिळविण्यासाठी कारखाने बंद पाडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. त्याचवेळी साखर उद्योग तोट्यात आणण्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगून, साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय आमदार जयंत पाटील यांनी घेतला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी खासगीकरणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा सच्चा नेता कोण?, असा सवाल उपस्थित होत आहे.दोन वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पेटवले होते. अखेरच्या टप्प्यात उसाच्या दराचा तिढा कोल्हापूरच्या कारखान्यांनी सोडविला. याचा काहीसा राग सांगली जिल्ह्यातील अनेक कारखाने हातात असणाऱ्या आमदार जयंत पाटील यांच्या मनात होता. त्यामुळे तीन हजार रुपये दर मिळाल्याशिवाय संघटनेने गळीत हंगाम सुरू करू देऊ नये, असे आव्हानच त्यांनी दिले होते.मागील गळीत हंगाम शांतपणे पार पडला. याला कारणही तसेच होते. एरव्ही ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत भाजपच्या वळचणीला जाऊन बसले होते. त्यांना मंत्रीपदाचे गाजर दिसत असल्यानेच त्यांनी गतवर्षी आंदोलन न करणे पसंत केले. शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी ऊस उत्पादकांच्या दरासाठी भांडण्याऐवजी स्वाभिमानीच्या नावाने खडे फोडले. त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे जयंत पाटील यांनी उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यास असमर्थता दर्शवत, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर खापर फोडले. शासनाच्या मदतीशिवाय एफआरपीची रक्कम देऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील काही सहकारी कारखान्यांनी शासन धोरणाला कंटाळून खासगीकरणाचा इशारा दिला आहे.याबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी संंपर्क साधला असता ते म्हणाले की, सहकारी कारखान्यांमध्ये सभासद आणि सरकारचे भागभांडवल आहे. शेतकऱ्यांना दर मिळावा म्हणून राज्यात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली आहे. हा उद्योग खासगी उद्योजकांकडे गेला, तर ऊस उत्पादकांची वाट लागणार आहे. शेतकऱ्यांच्या ठेवी हडप करण्याचा डाव साखरसम्राटांचा आहे. जयंत पाटील यांना आता ऊस उत्पादकांचा पुळका आला आहे. त्यांनी उसाला दर मिळण्यासाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे, तर त्यांच्याच शेजारचे शेतकरी संघटनेचे नेते एफआरपीसाठी कारखाने बंद करण्याचा इशारा देत आहेत. गेली २0 वर्षे आम्ही यासाठीच आंदोलने केली आहेत. आता त्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी घेतली आहे, यातच शेतकरी संघटनेचा विजय आहे.एकूणच साखर कारखान्यांच्या फडात नुसतीच टोलवाटोलवी सुरू आहे. नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा'कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिला आहे, तर सांगली जिल्ह्यातील साखरसम्राटांनी सहकारी कारखाने खासगी करण्याची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे खा. शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा ऊस उत्पादकांचा कळवळा आला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचा मोर्चा कोल्हापूर येथील साखर उपसंचालकांच्या कार्यालयावर काढला जाणार आहे.बघता बघता राज्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या ५५ वर जाऊन पोहोचली आहे. सामान्य माणसाला सहकार हाच आधार आहे. साखरसम्राटांबरोबर आमचे मतभेद आहेत. परंतु सहकारी साखर कारखान्यावरील आमची निष्ठा कायम आहे. सहकारामध्ये वर्षातून एकदा सभासदाला मत मांडता येते. पाच वर्षातून एकदा मतदानाचा अधिकार मिळतो. कारखाने खासगी झाले, तर सभासदांचा आवाज दबला जाईल. साखरसम्राटांनीच कारखाने आजारी पाडायचे, त्यांनीच ते खरेदी करायचे, हा उद्योग बंद झाला पाहिजे.- खासदार राजू शेट्टी