शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

लाॅकडाऊनच्या भीतीने बाजारात तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST

सांगली : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी शहरातील सर्वच बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. त्यात संभाव्य ...

सांगली : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी शहरातील सर्वच बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. त्यात संभाव्य लाॅकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात रांगा लावल्या होत्या. जमावबंदी, कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन मात्र नागरिकांच्या वर्तनापुढे हतबल झाल्याचे दिसून आले.

राज्य शासनाने शनिवार व रविवार या दोन दिवसांसाठी वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला होता. या लाॅकडाऊनला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवस शहरातील सर्वच बाजारपेठा, दुकाने पूर्णत: बंद होती. रस्त्यावर वर्दळही फारशी नव्हती. त्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची शासनाकडून सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कडक लाॅकडाऊन होणार असल्याच्या भीतीने सोमवारी शहरातील रस्त्यावर नागरिक मोठ्या संख्येने उतरले होते.

शहरातील हरभट रोड, मारुती रोड, कापडपेठ या परिसरात किरकोळ खरेदीसाठी सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी झाली होती. गणपती पेठेत किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी होती. त्यामुळे काहीकाळ या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. शिवाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी महिलांची गर्दी होती. अगदी काॅस्मेटिक दुकानांतही रांगा लागल्या होत्या. किराणा, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला मिनी लाॅकडाऊनमध्ये परवानगी दिली असली तरी बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सुरू होती. अनेकांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू केला होता. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोबाइल दुकानात तरुणांनी गर्दी केली होती. यावेळी कुठेच जमावबंदीच्या आदेशाचे पालन होताना दिसत नव्हते. दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. अनेकांनी तोंडाला मास्कही लावलेला नव्हता. कोरोना नियमांची पायमल्ली करीत नागरिकांकडून खरेदी सुरू होती.

चौकट

मार्केट यार्ड, माॅल्स हाऊसफुल्ल

लाॅकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी वसंतदादा मार्केट यार्डात सकाळपासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. दिवसभर दुकानात गर्दी होती. तीच स्थिती शहरातील माॅल्समध्येही होती. डिमार्ट, दांडेकरसह अनेक माॅल्समध्ये मोठी गर्दी झाली होती. काही माॅल्सनी तर ग्राहकांची गर्दी पाहून थोड्या काळासाठी प्रवेश बंदही केला होता.

चौकट

प्रशासन हतबल

बाजारपेठ, मार्केट यार्ड, माॅल्समध्ये सोमवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीच यंत्रणा कार्यरत नव्हती. काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता; पण तोही अपुरा होता. दुपारनंतर महापालिका व शहर पोलिसांनी एकत्र येत गर्दी कमी करण्यासाठी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला.