शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

मिरज पश्चिम भागात जोमाने ऊसतोडी

By admin | Updated: November 23, 2014 23:52 IST

दराचा प्रश्न कायम : राजकारणात आंदोलन गुंडाळल्याची चर्चा

कसबे डिग्रज : गेली कित्येक वर्षे गळीत हंगामाची सुरुवात ऊसदर आंदोलनाने होत होती. रास्ता रोको, ट्रॅक्टर, उसाच्या गाड्यांच्या टायर फोडणे, जाळपोळ, पोलीस रस्त्यांवर... यासह पंधरवडा घुमत होता. पण राज्यात सरकार बदलले, शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बोटचेपी भूमिका आणि शेतकऱ्यांना साखरसम्राटांनी गतवर्षी दिलेला त्रास, अशा विविध प्रकारच्या राजकारणात ऊसदर आंदोलन गुंडाळल्याची चर्चा असून परिसरात सुमारे ९० टोळ्या ऊसतोडी जोमाने करीत आहेत.ऊसदर आंदोलनासाठी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणित संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना यांची ऊसदरासाठी मोठी आंदोलने होत होती. खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत जोमदारपणे रान तापवत होते. काहीवेळा साखर कारखानदार, प्रसारमाध्यमे, सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत सर्वसाधारण तोडगा काढून ऊसतोडी सुरू होत होत्या. यावर्षी ऊसदर नियामक मंडळाच्या बैठका होत आहेत.यावर्षी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये बोटचेपी भूमिका घेऊन खा. राजू शेट्टी यांनी गतवर्षीपेक्षा इतिहासात प्रथमच २७०० रुपये अशी कमी मागणी केली. त्याचवेळी ऊस उत्पादकांमध्ये खा. राजू शेट्टींच्या भूमिकेबद्दल ‘शंकेची’ स्थिती निर्माण झाली. त्यानंतर कोणत्याही मोठ्या आंदोलनाशिवाय किंवा मोठ्या बैठकीशिवाय विनासायास साखर कारखाने सुरू झाले. कोणीही पहिला हप्ता जाहीर केला नाही, असे प्रथमच घडले. रघुनाथदादा पाटील आणि मनसेने ३५०० रुपयांची मागणी केली होती. पण त्यांचा जोर अपुरा पडला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एफआरपी द्यावी लागेल, असे जाहीर केले आहे. ती साधारणपणे २५०० रुपयांपर्यंत आहे. गतवर्षी पंतप्रधानांसोबत होणारी बैठक हे ऊसदर आंदोलनाचे फलित होते. एवढा हा प्रश्न गाजला होता. पण खा. राजू शेट्टी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावर्षी त्यांनी अशी बोटचेपी भूमिका का घेतली? असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे. का ऊसतोडी झाल्यानंतर आंदोलन करणार, अशी स्थिती आहे? (वार्ताहर)नियामक मंडळाकडे लक्षरघुनाथदादा पाटील, खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत ऊस आंदोलनात रान तापवत होते. काहीवेळा साखर कारखानदार, प्रसारमाध्यमे, सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत तोडगा काढून ऊसतोडी सुरू होत होत्या. यावर्षी ऊस दर नियामक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.