शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शस्त्रास्त्रांसह विनापरवाना घुसलेल्या तिघांना पाच दिवसांची वनकोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 15:49 IST

अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याकत आरोपी कैद

सांगली: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात विनापरवाना शस्त्रास्त्रांसह घुसलेल्या तीन आरोपीना वन्यजीवच्या पथकाने पकडले असून तिघांनाही रत्नागिरीच्या न्यायदंडाधिका-यानी पाच दिवसांची  वनकोठडी सुनावली आहे. संदिप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनील कामतेकर अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड स्थित चांदोली राष्ट्रीय उद्यानचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी दिलेल्या माहितीनुसार व प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोट नुसार अधिक माहिती अशी.अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमे-यात काही आरोपी ३१मार्चला कैद झाले होते त्याची पाहणी वन्यजीव चे वनक्षेत्रपाल नंदकुमार  नलवडे यानी केली व कराडच्या वन्यजीव कार्यालयास याची माहिती दिली.त्यानंतर विभागिय वनाधिकारी  विशाल माळी,उपसंचालक उत्तम सावंत,  यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे ,फिरती पथकाचे शिशूपाल पवार याना पाचारण करून पथकामार्फत आंबा व आसपासच्या गावातील व डोंगरकपारीतील वाड्यावस्तीवर  संशयीतांचा शोध घेण्याचे काम  एक एप्रिल ला सुरू केले. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हातिव(गोठणे पुनर्वसितगाव) येथे तपास पथक पोहचल्यावर गावात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. कसून चौकशी केल्यावर एक संशयित आरोपी मिळून आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दुसरे दोन संशयीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन एप्रिल ला मारळ ता.संगमेश्वर येथील दोघा आरोपीना ताब्यात घेतले.त्यांच्यावर वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत अटक करून गुन्हा दाखल करून देवरुख येथे वैद्यकीय चाचणी करून  त्याना रत्नागिरीतील न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले.त्यानी  सदरच्या तीन आरोपीना ७ एप्रिल पर्यंत वनकोठडी (फाॅरेस्ट कस्टडी) सुनावली आहे.सदरच्या गुन्ह्य़ात वन्यप्राण्यांच्या  शिकारीची शक्यता असून त्यांचे मोबाईल मध्ये अनेक संशयास्पद फोटो आढळून आले आहेत. त्यामुळे  महत्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.या करवाईत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत,उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी,सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे,वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे,फिरती पथकाचे वनक्षेत्रपाल शिशूपाल पवार, निवळेचे वनपाल गारदी,वनरक्षक दणाणे,रत्नागिरी वनविभाग अधिकारी दिपक खाडे, वनक्षेत्रपाल प्रियांका लगड,देवरुख चे वनपाल मुल्ला ,वनरक्षक गावडे व स्थानिक पोलीस पाटील व सरपंच सहकार्य लाभले.दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड च्या कार्यालयाने जाहीर आवाहन केलंय की, वन्य पशू पक्षी पाळणे, हाताळणे, विक्री करणे व शिकार करणे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कायद्याने गुन्हा आहे .वन्य पशूपक्षी याना हानी पोहचवणा-याबद्दल  माहिती मिळताच हॅलो फाॅरेस्ट च्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर व जवळच्या वनविबागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.