शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाटमारीचे तीन गुन्हे उघडकीस

By admin | Updated: October 8, 2015 01:09 IST

एकास अटक : तिघे फरारी; कारागृहात तयार झाली टोळी

सांगली : गेल्या महिन्यात सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण व कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत झालेल्या वाटमारीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मंगळवारी यश आले. टोळीतील अजित ऊर्फ छोट्या अशोक कोळी (वय २४, लक्ष्मीनगर, नरवाड, ता. मिरज) यास अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार फरारी आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे चौघेही सांगलीच्या कारागृहात असताना त्यांची ओळख झाली. यातून त्यांनी नवीन टोळी करून हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी दिले होते. त्यानुसार निरीक्षक घनवट यांच्या पथकाने गेल्या महिन्याभरात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी अजित कोळी जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती मिळाली. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात तो कारागृहात होता. मैत्रीनंतर गुन्ह्यांची मालिकाअजित कोळी याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत बलात्कार, वाटमारीचे, तर अनिल मानेविरुद्ध शहर पोलिसांत अमली पदार्थ बाळगणे, तसेच सिद्धेश्वर सोन्नुरे याच्याविरुद्ध जत, कवठेमहांकाळ पोलिसांत वाटमारीचे गुन्हे नोंद आहेत. विकास हजारे व गणेश या दोघांचे अद्याप रेकॉर्ड मिळाले नसल्याचे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सांगितले. ते म्हणाले, हे चौघेही विविध गुन्ह्यांत सांगली जिल्हा कारागृहात एकाच बऱ्याकमध्ये होते. तिथे त्यांची चांगली ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर ते संपर्क साधून एकत्रित आले अन् गुन्ह्यांची मालिकाच रचली.