शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

रस्ते हस्तांतरावरून तीन भाऊंमध्ये कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:18 IST

सांगली : जिल्ह्यातील ८ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून, ५५० किलोमीटरच्या रस्ते दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यावरून सर्वसाधारण सभेत

ठळक मुद्देजिल्हा परिषद सर्वसाधारण सभा वादळी चर्चेनंतर ५५० रस्त्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ८ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून, ५५० किलोमीटरच्या रस्ते दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यावरून सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, काँग्रेसचे सदस्य सत्यजित देशमुख आणि जितेंद्र पाटील या तीन भाऊंमध्ये कलगीतुरा रंगला. अखेर वादळी चर्चेनंतरही जिल्हा परिषदेकडील ५५० रस्ते हस्तांतरणाचा निर्णय झाला.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत रस्त्यांची दर्जोन्नती केल्याशिवाय निधी मिळणार नसल्याचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. हस्तांतरणाला सत्यजित देशमुख, जितेंद्र पाटील यांनी विरोध केला. जितेंद्र पाटील म्हणाले की, तुमचे सरकार अच्छे दिन आणतो म्हणत आहे. त्यामुळे सरसकट जिल्ह्यातील रस्ते हस्तांतरीत करून अच्छे दिन आल्याचे सांगा.त्यावर अध्यक्ष देशमुख म्हणाले की, सभागृहामध्ये आपण जिल्ह्याच्या विकासावर बोललो तर बरे होईल. या वादावर सत्यजित देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेकडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करून जिल्हा परिषदेचे नुकसान करू नका. यावर संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, जि. प. ला शासनाकडून निधी मिळत आहे. पण तो रस्ते दुरुस्तीसाठी पुरेसा नसल्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्तरावर पाटील, देशमुख यांनी सरसकट रस्ते हस्तांतरित न करता त्यांची लांबी लक्षात घेऊन हस्तांतरित करण्याची सूचना मांडली. याला सदस्यांनी मंजुरी दिल्याने ५५० रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती सुषमा नायकवडी, सुहास बाबर, अभिजित राऊत, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर उपस्थित होते.सर्वसाधारण सभेतून...बोरगाव (ता. तासगाव) येथे डॉक्टर, आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावला. या दोषींवर कारवाईची अर्जुन पाटील यांची मागणी.आरोग्य केंद्रातील वाहनांना चालक पुरविणाºया ठेकेदारांची चौकशी करण्याची सदस्य डी. के. पाटील यांची मागणी. त्यानुसार चौकशी करण्याचे अध्यक्षांचे आश्वासनबोरगाव-बावची पाणी पुरवठा योजनेच्या ठरावाचे पुनरावलोकनकृषी विभागाची १ कोटी ३१ लाख रुपयांची कामे मंजुरीविना प्रलंबितजत तालुक्यातील ४ शाळा बंद, ६ शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा महादेव दुधाळ यांचा आरोपआरोग्य केंद्रातील सोलरच्या चौकशीची मागणीढालगाव आरोग्य केंद्राच्या निविदांचा प्रश्न ऐरणीवरहमीभाव, आॅनलाईनपेक्षा अनुदान द्याउदीड, मूग आणि सोयाबीन हमीभावाने घेण्यासाठी शासनाकडून आॅनलाईन नोंदणी अनिवार्य केली आहे. शेतकºयांच्या सात-बारावर पीकपाण्याची नोंदणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. दिवाळीच्या तोंडावर शेतकºयांचा माल बाजारातही विक्री होऊ शकत नाही आणि हमीभावाचा लाभही घेता येत नसल्याचे सत्याजित देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांचा माल खरेदी करून घेऊन शासनाने अनुदान द्यावे. सोयाबीनचे ३५ लाख टन उत्पन्न असताना शासनाकडून एक लाख टनाची जबाबदारी घेतली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला.अभिजित राऊत यांचा सत्कारस्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षांच्याहस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा व पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा सत्कार करण्यात आला. ं