शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

हरिपुरला बंगला फोडणाऱ्या तिघांना अटक; तिघे उमळवाड, कुंभोजचे : ३८ लाखाचा चोरीचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Updated: August 19, 2024 21:30 IST

तिघांकडून ३८ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून सांगली ग्रामीणचे पाच गुन्हे, संजयनगर व शिरोळचा एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस आणले.

घनशाम नवाथेसांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बंद बंगला फोडून पुरावा न सोडता पसार झालेल्या तौफिक सिकंदर जमादार (वय ३१) , दिपक पितांबर कांबळे (वय २७, दोघेही रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि समीर धोंडिबा मुलाणी (वय ३१, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) या तिघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुसक्या आवळल्या. तिघांकडून ३८ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून सांगली ग्रामीणचे पाच गुन्हे, संजयनगर व शिरोळचा एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस आणले.

अधिक माहिती अशी, सांगली शहर आणि परिसरात काही महिन्यांपासून घरफोड्यांचे गुन्हे घडत आहेत. हरिपूर येथेही दोन आठवड्यापूर्वी दोन बंगले फोडण्याची घटना घडली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे अन्वेषणच्या शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. हरिपुरातील घरफोड्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी उपनिरिक्षक कुमार पाटील यांचे पथक नियुक्त केले होते.

गेल्या दहा-बारा दिवसापासून पथक वेगवेगळ्या मार्गाने तपास करत होते. पथकातील संदिप नलावडे आणि अरुण पाटील यांना सोमवारी सकाळी तिघे संशयित जुना हरिपूर रस्ता परिसरात दुचाकी (एमएच ०९ ईएच ७११०) वरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. परिसरात सापळा रचल्यानंतर काही वेळाने तिघेजण दुचाकीवरुन घटनास्थळी आले. त्यांना पलायन करण्याची संधी न देता ताब्यात घेतले. दुचाकीस अडकवलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सोने - चांदीचे दागिने असल्याचे निदर्शनास आले.संशयितांकडे दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत संशयित तौफिक जमादार, दिपक कांबळे आणि समीर मुलाणी यांनी हरिपूर गावात मागील सहा महिन्यांपासून बंद घरे फोडली असल्याची कबुली दिली. तसेच वारणाली परिसरातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी हस्तगत केलेला ऐवज चोरीतील असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पाच, संजयनगर आणि शिरोळ ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केल्याचे सांगितले.

निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी दरीबा बंडगर, सागर लवटे, अमर नरळे, प्रकाश पाटील, सुशिल मस्के, सूरज थोरात, योगेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

नवीन पुलाचा असाही फायदा

हरिपूर-कोथळी हा सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पूल काही महिन्यांपूर्वीच खुला झाला आहे. या पुलामुळे चोरटे सहजपणे कोथळीहून हरिपुरात येत होते. बंद बंगले, घरे हेरून चोरी करत होते असे तपासात स्पष्ट झाले. दोन्हीकडच्या नागरिकांबरोबर चोरट्यांनीही नवीन पुलाचा फायदा घेतला होता. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज भासू लागली आहे.

दोघे सराईत गुन्हेगार

तौफिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर मुलाणी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा नोंद आहे. दीपक हा मजुरी करतो. तो त्यांच्या टोळीत सहभागी झाला होता.