शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट

By admin | Updated: January 6, 2015 00:45 IST

चाळीस लाखांचे नुकसान : बामणीत वादळी वाऱ्याचा दणका

विटा/पारे : बामणी (ता. खानापूर) येथे वादळी वाऱ्याने तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाल्याची घटना आज (सोमवारी) पहाटे घडली. यात द्राक्षबागायतदार राजाराम बाळू लेंगरे (रा. बामणी) यांचे सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वाऱ्याने अवघ्या वीस मिनिटात लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरल्याने लेंगरे व त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. बामणी येथील राजाराम लेंगरे यांची बामणी व हातनोलीच्या मध्यभागी तीन एकर सोनाक्का जातीची द्राक्षबाग आहे. बागेत सुमारे ६० ते ७० टन द्राक्ष माल काढणीच्या स्थितीत होता. आज द्राक्षपीक काढण्याचा प्रारंभ सकाळी अकरा वाजता होणार होता. त्याची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. परंतु, पहाटे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली. दुष्काळात टॅँकरने पाणी घालून जगविलेली तीन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्याने कोसळल्याने सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लेंगरे यांच्यासह त्यांची मुले शहाजी, शशिकांत यांच्या कुटुंबावर मोठे नैसर्गिक संकट कोसळले.आ. अनिल बाबर यांनी बामणी येथे जाऊन द्राक्षबागेची पाहणी केली. शासन स्तरावर नुकसानभरपाईसाठी प्रयत्न केले जातील. पीक विमा योजनेचे निकष बदलण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी संजय विभुते, भरत लेंगरे, सुखदेव माने, बबन शेळके, महावीर शिंदे, श्रीकांत सपकाळ, आनंदराव शेळके, कुमार शिंदे उपस्थित होते.दरम्यान, कृषी विभागाचे डी. एल. मसुगडे, पी. एन. पवार, तलाठी एफ. ए. मुल्ला यांनी द्राक्षबागेच्या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदार सौ. अंजली मरोड यांना अहवाल सादर केला. (वार्ताहर)ढगाळ हवामानसांगली जिल्ह्यात अद्यापही ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष, डाळिंब उत्पादकांसोबत रब्बी शेतकऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. हजारो रूपयांची औषधे फवारूनही हवामानाच्या धास्तीमुळे उत्पादनाची खात्री नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.