शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट

By admin | Updated: January 6, 2015 00:45 IST

चाळीस लाखांचे नुकसान : बामणीत वादळी वाऱ्याचा दणका

विटा/पारे : बामणी (ता. खानापूर) येथे वादळी वाऱ्याने तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाल्याची घटना आज (सोमवारी) पहाटे घडली. यात द्राक्षबागायतदार राजाराम बाळू लेंगरे (रा. बामणी) यांचे सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वाऱ्याने अवघ्या वीस मिनिटात लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरल्याने लेंगरे व त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. बामणी येथील राजाराम लेंगरे यांची बामणी व हातनोलीच्या मध्यभागी तीन एकर सोनाक्का जातीची द्राक्षबाग आहे. बागेत सुमारे ६० ते ७० टन द्राक्ष माल काढणीच्या स्थितीत होता. आज द्राक्षपीक काढण्याचा प्रारंभ सकाळी अकरा वाजता होणार होता. त्याची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. परंतु, पहाटे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली. दुष्काळात टॅँकरने पाणी घालून जगविलेली तीन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्याने कोसळल्याने सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लेंगरे यांच्यासह त्यांची मुले शहाजी, शशिकांत यांच्या कुटुंबावर मोठे नैसर्गिक संकट कोसळले.आ. अनिल बाबर यांनी बामणी येथे जाऊन द्राक्षबागेची पाहणी केली. शासन स्तरावर नुकसानभरपाईसाठी प्रयत्न केले जातील. पीक विमा योजनेचे निकष बदलण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी संजय विभुते, भरत लेंगरे, सुखदेव माने, बबन शेळके, महावीर शिंदे, श्रीकांत सपकाळ, आनंदराव शेळके, कुमार शिंदे उपस्थित होते.दरम्यान, कृषी विभागाचे डी. एल. मसुगडे, पी. एन. पवार, तलाठी एफ. ए. मुल्ला यांनी द्राक्षबागेच्या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदार सौ. अंजली मरोड यांना अहवाल सादर केला. (वार्ताहर)ढगाळ हवामानसांगली जिल्ह्यात अद्यापही ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष, डाळिंब उत्पादकांसोबत रब्बी शेतकऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. हजारो रूपयांची औषधे फवारूनही हवामानाच्या धास्तीमुळे उत्पादनाची खात्री नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.