शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

अटकेच्या भीतीने पोलिस अधिकाऱ्यांसह तिघे फरार

By admin | Updated: July 15, 2016 23:56 IST

संशयिताची आत्महत्या : सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचे सीआयडी पथक मागावर; सोलापूरमध्ये छापे

सांगली/उमदी : धुमकनाळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील चंद्रशेखर नंदगोंड (वय ३०) या तरुणाने पोलिस ठाण्याच्या आवारात आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने उमदी (ता. जत) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, उपनिरीक्षक राजाराम चिंचोळीकर व हवालदार प्रमोद रोडे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाची तीन पथके तैनात केली आहेत. पथकांनी सांगली, सोलापूर जिल्ह्यासह मिरज तालुक्यात छापे टाकले; पण त्यांचा सुगावा लागलेला नाही. उमदी येथे गेल्या महिन्यात झालेल्या महिलेच्या खूनप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेखर नंदगोंड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ६ जूनला त्याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाइकांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सांगलीच्या सीआयडी विभागाकडे सोपविली होती. या विभागाचे पोलिस उपअधीक्षक एन. आर. पन्हाळकर, निरीक्षक गीता बागवडे, हवालदार संजय कुलगुटगी, विजय चौगुले यांच्या पथकाकडून गेल्या दीड महिन्यापासून चौकशी सुरू होती. यामध्ये पोलिसांची मारहाण तसेच डांबूून ठेवल्याच्या भीतीने नंदगोंड याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार उपअधीक्षक पन्हाळकर यांनी गुरुवारी वाघमोडे, चिंचोळीकर या दोन अधिकाऱ्यांसह हवालदार रोडे याच्याविरुद्ध डांबून ठेवणे, मारहाण करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच या तिघांनी अटकेच्या भीतीने पलायन केले आहे. वाघमोडे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचे, तर चिंचोळीकर भंडारकवठे गावचे आहेत. रोडे मिरज तालुक्यातील आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील सीआयडीची तीन स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. सांगलीच्या पथकातील निरीक्षक गीता बागवडे, हवालदार संजय कलगुटगी यांच्या पथकाने गुरुवारी रात्री, तसेच शुक्रवारी उमदीत जाऊन चौकशी केली, पण अटकेच्या भीतीने हे तिघेही फरार झाल्याची माहिती मिळाली. त्यांचे मोबाईलही बंद आहेत. कोल्हापूर व सातारच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात छापे टाकून वाघमोडे व चिंचोळीकरचा शोध घेतला; परंतु सुगावा लागलेला नाही. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तिघेही न्यायालयातून जामीन घेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पथकास मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी तीन जिल्ह्यांतील पथके मागावर सोडण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)--------------‘थर्ड डिग्री’चा वापर!महिलेच्या खूनप्रकरणी नंदगोंड यास ४ जूनला ताब्यात घेतले होते. मृत महिलेच्या मोबाईलवर शेवटचा कॉल त्याचाच होता. त्याच्याविरुद्ध पुरावेही भरपूर होते. उमदी पोलिस त्याला अटक करू शकत होते, पण त्यांनी तसे केले नाही. गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याचे सीआयडीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याला पट्टा तसेच काठीने बेदम मारहाण केली. तीन दिवस त्यास डांबून ठेवले. पोलिसांच्या मारहाणीला घाबरुनच त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याच्या अंगावर एकूण १२ जखमा आढळून आल्या आहेत. यातील गळ्यातील एक जखम त्याने गळफासाने आत्महत्या केल्याची आहे. उर्वरित ११ जखमा पोलिसांच्या मारहाणीतील असल्याचे स्पष्ट झाले होते. या महत्त्वाच्या पुराव्यावरच वाघमोडे, चिंचोळीकर व रोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसप्रमुखांना अहवालवाघमोडे, चिंचोळीकर व रोडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती व त्यासंदर्भातील अहवाल उपअधीक्षक पन्हाळकर यांनी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना सादर केला आहे. त्यामुळे पोलिसप्रमुखांकडून लवकरच या तिघांवर पुढील कारवाई, तसेच खात्यांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे. संख चौकीतील चौकशीनंदगोंड याने आत्महत्या करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर उमदी पोलिस ठाणे हद्दीतील संख पोलिस चौकीत एका संशयिताचा मृत्यू झाला होता. पत्नीसोबत केलेल्या भांडणातून या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचीही सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये आणखी किती पोलिस अडकणार? अशी शुक्रवारी चर्चा सुरूहोती.