शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

हजारो पूरग्रस्त घरातून पुन्हा निवारा केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढविल्याने सांगली शहरातील पूरग्रस्त धास्तावले आहेत. पाणी ओसरले म्हणून घरी परतलेले अनेक नागरिक महापालिकेच्या ...

सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढविल्याने सांगली शहरातील पूरग्रस्त धास्तावले आहेत. पाणी ओसरले म्हणून घरी परतलेले अनेक नागरिक महापालिकेच्या सूचनेनंतर पुन्हा निवारा केंद्रात परतले आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केल्याने शहरातील पूर ओसरलेल्या भागांत पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली शहरातील अनेक भाग गेल्या दोन दिवसांत पुराच्या विळख्यातून सुटले आहेत. घरे, दुकाने यांच्या स्वच्छतेची कामेही अद्याप सुरू आहेत. अशा स्थितीत धरणांतून विसर्ग वाढल्याने व नदीपातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने सांगलीतील पूरग्रस्त धास्तावले आहेत. ज्या भागांत पाणी ओसरले आहे, अशा काही भागांमध्ये पुन्हा पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेकडून पूरग्रस्तांना निवारा केंद्रात थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

चौकट

या भागांतील नागरिकांना सूचना

महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना निवारा केंद्रातच थांबण्याची सूचना केली. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौक, दत्तनगर, काकानगर, साईनाथनगर, कृष्णामाईनगर, जुना बुधगाव रस्त्यावरील राजीव गांधी झोपडपट्टी, वाल्मिकी आवास, वखारभाग परिसरातील लोणी गल्ली, शामरावनगर परिसरातील रुक्मिणीनगर, विठ्ठलनगर, सहारा कॉलनी, कोल्हापूर रोडवरील रामनगर, काळीवाट, आदी भागांत पाहणी करून नागरिकांना सूचना देण्यात आल्या.

चौकट

व्यापारी पेठेतही सतर्कता

सांगलीच्या मारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांची स्वच्छता केली आहे. अशा परिस्थितीत ड्रेनेजचे बॅकवॉटर आनंद चित्रमंदिरापासून मारुती चौकापर्यंत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना दुकानात आताच माल न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चौकट

पाणी इशारा पातळीच्या खाली

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या ३७ फुटांवर असून पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. ४२ किंवा ४३ फुटांवर पाणी गेले तर पुराचे पाणी पुन्हा अनेक भागांना कवेत घेण्याची शक्यता आहे.

चौकट

भरपाईच्या घोषणेने गोंधळ

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी मदतीची घोषणा केल्याने व पंचनामे सुरू झाल्याने निवारा केंद्रांतील अनेक लोक दिवसभर पंचनाम्याच्या शक्यतेने पूरग्रस्त घरातच थांबत असल्याचे दिसत आहे.