शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो पूरग्रस्त घरातून पुन्हा निवारा केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढविल्याने सांगली शहरातील पूरग्रस्त धास्तावले आहेत. पाणी ओसरले म्हणून घरी परतलेले अनेक नागरिक महापालिकेच्या ...

सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढविल्याने सांगली शहरातील पूरग्रस्त धास्तावले आहेत. पाणी ओसरले म्हणून घरी परतलेले अनेक नागरिक महापालिकेच्या सूचनेनंतर पुन्हा निवारा केंद्रात परतले आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केल्याने शहरातील पूर ओसरलेल्या भागांत पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली शहरातील अनेक भाग गेल्या दोन दिवसांत पुराच्या विळख्यातून सुटले आहेत. घरे, दुकाने यांच्या स्वच्छतेची कामेही अद्याप सुरू आहेत. अशा स्थितीत धरणांतून विसर्ग वाढल्याने व नदीपातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने सांगलीतील पूरग्रस्त धास्तावले आहेत. ज्या भागांत पाणी ओसरले आहे, अशा काही भागांमध्ये पुन्हा पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेकडून पूरग्रस्तांना निवारा केंद्रात थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

चौकट

या भागांतील नागरिकांना सूचना

महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना निवारा केंद्रातच थांबण्याची सूचना केली. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौक, दत्तनगर, काकानगर, साईनाथनगर, कृष्णामाईनगर, जुना बुधगाव रस्त्यावरील राजीव गांधी झोपडपट्टी, वाल्मिकी आवास, वखारभाग परिसरातील लोणी गल्ली, शामरावनगर परिसरातील रुक्मिणीनगर, विठ्ठलनगर, सहारा कॉलनी, कोल्हापूर रोडवरील रामनगर, काळीवाट, आदी भागांत पाहणी करून नागरिकांना सूचना देण्यात आल्या.

चौकट

व्यापारी पेठेतही सतर्कता

सांगलीच्या मारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांची स्वच्छता केली आहे. अशा परिस्थितीत ड्रेनेजचे बॅकवॉटर आनंद चित्रमंदिरापासून मारुती चौकापर्यंत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना दुकानात आताच माल न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चौकट

पाणी इशारा पातळीच्या खाली

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या ३७ फुटांवर असून पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. ४२ किंवा ४३ फुटांवर पाणी गेले तर पुराचे पाणी पुन्हा अनेक भागांना कवेत घेण्याची शक्यता आहे.

चौकट

भरपाईच्या घोषणेने गोंधळ

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी मदतीची घोषणा केल्याने व पंचनामे सुरू झाल्याने निवारा केंद्रांतील अनेक लोक दिवसभर पंचनाम्याच्या शक्यतेने पूरग्रस्त घरातच थांबत असल्याचे दिसत आहे.