शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे मिरज तालुक्यातील हजारो एकरातील फुले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST

मिरज : कोरोना प्रतिबंधासाठी सलग दुसऱ्या वर्षी लाॅकडाऊनमुळे मिरज तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रातील फुलांचे पिक वाया जात आहे. ...

मिरज : कोरोना प्रतिबंधासाठी सलग दुसऱ्या वर्षी लाॅकडाऊनमुळे मिरज तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रातील फुलांचे पिक वाया जात आहे. मिरजेतील फुलांच्या बाजारात दररोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुलांची विक्री बंद असल्याने फुले तोडून शेतातच टाकून देण्याची वेळ आली आहेत.

गतवर्षीचे लाॅकडाऊनमधून सावरल्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या झेंडू, गुलाब, निशिगंध, गलाटा, लिली या फुलांचे पिक लग्नाच्या हंगामासाठी तयार झाली आहेत. एप्रिल महिन्यात पुन्हा लाॅकडाऊन सुरु झाल्याने फुले शेतातच वाळत आहेत. मे महिन्यात फुलांचा व्यापार सुरु होईल या अपेक्षेने पीक जगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना लाॅकडाऊन वाढल्याने नांगरून पिके काढून टाकण्याची वेळ आली आहे. फुलांचे नियमित उत्पादन घेण्यासाठी नियमित तोडणी करावी लागते. मात्र तोडणी खर्च परवडणारा नसल्याने हजारो एकरातील पिके सोडून देण्यात आली आहेत. यापैकी गुलाब व हरितगृहातील जरबेरा कार्नेशिया ही फुले वगळता झेंडू, गुलाब, लिलि, गलांडा, निशिगंध या फुलांची पुन्हा लागवड करावी लागणार आहे. मिरज तालुक्यात सुमारे दोन हजार एकर झेंडू, हजार एकर निशिगंध, गलांडा, पाच हजार एकर गुलाबाचे क्षेत्र आहे. मिरजेतील फुलांच्या बाजारातून दररोज मुंबई कोकणसह कर्नाटकात फुलांची निर्यात होते. स्थानिक बाजाराच्या तुलनेत मोठ्या शहरात मागणी व दर जास्त असल्याने वर्षभर फुलांची निर्यात सुरु असते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी लग्नाच्या हंगामातच फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जिल्ह्यात हरितगृहात डच गुलाब, जरबेरा, कार्नेशिया या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. फुलांच्या निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न बंद झाले मात्र झाडे जगविण्यासाठी धडपड सुरु आहे. गुलाबाची व हरितगृहातील फुलांची झाडे जगविण्यासाठी नियमित तोडणी करावी लागते. मात्र इतर फुलांची पुन्हा लागवड करण्यासाठी एकरी ४० ते ६० हजार खर्च करावा लागणार आहे. बाजारपेठा बंद झाल्याने फुले टाकून देण्याची, पिकात जनावरे सोडण्याची व नांगरून पीक काढून टाकण्याची वेळ आल्याने फुले उत्पादक हवालदिल आहेत. लाॅकडाऊन कधी संपणार हे अनिश्चित असल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी असल्याचे फुलांचे व्यापारी पंडित कोरे यांनी सांगितले.