शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीमध्ये तीस कोटींचा फटका

By admin | Updated: November 27, 2014 00:22 IST

वसुली होणारच : मुख्यमंत्र्यांच्या संकेताने व्यापारी हादरले

सांगली : महापालिकेला गेल्या सहा महिन्यात एलबीटीतून ४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जकातीच्या उत्पन्नाशी तुलना करता, सहा महिन्यात ३२ कोटी रुपयांची तूट झाली आहे. एलबीटी लागू झाल्यापासून तुटीचा आकडा वाढतच चालला असून पालिकेला आतापर्यंत ११० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील भाजपचे सरकार एलबीटी रद्द करणार असले तरी मागील कर चुकणार नसल्याने, व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सांगली महापालिका क्षेत्रात २१ मे २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. आजअखेर व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध करीत आंदोलन हाती घेतले. राज्यातील इतर महापालिकांच्या उत्पन्नात वाढ होत असताना, सांगली महापालिकेच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घटच होत गेली. मार्च २०१४ पर्यंत एलबीटीतून ११० कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. पण तब्बल ८० कोटींचा फटका बसला होता. गेल्या सहा महिन्यात एलबीटी विभागाने ४२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी एलबीटी हटविण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून दिले होते. त्याचा परिणामही पालिकेच्या उत्पन्नावर झाला. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एलबीटी रद्द करण्याची मागणी केली. त्यात भाजपच्या मंत्र्यांतील विसंवादामुळे एलबीटीबाबत वेगवेगळी व्यक्तव्ये करण्यात आली. अखेर काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट करतानाच कर भरण्याचेही आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. केंद्र शासनाने जीएसटी लागू करण्याची घोषणा केली आहे. पण त्याचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर त्यात एलबीटीचा समावेश होणार आहे. त्यामुळे किमान जीएसटीपर्यंत तरी एलबीटी व्यापाऱ्यांना भरावा लागेल, असे दिसते. (प्रतिनिधी) मागील कर वसूल होणारच‘फॅम’ व व्यापाऱ्यांच्या संघटनांनी एलबीटी रद्द करताना तो लागू झाल्याच्या तारखेपासून (बॅक डेटेट) असावा, असा आग्रह धरला आहे. पण ही बाब शक्य होणार नाही. राज्यातील विविध महापालिकांचे एलबीटीचे उत्पन्न चांगले आहे. एलबीटीच्या अंमलबजावणीपासून हा निर्णय झाल्यास आतापर्यंत कर भरलेल्या व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे परत करावे लागतील. ही जोखीम शासन घेईल, असे वाटत नाही. एप्रिलनंतर पालिका श्रीमंतमहापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडून एलबीटीची तब्बल ११० कोटी रुपयांची वसुली होणे बाकी आहे. शासनाने कोणताही निर्णय घेतला तरी मागील कर भरावा लागणार आहे. त्यामुळे एप्रिलनंतर पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटींपेक्षा जादा कराची भर पडेल आणि पालिका श्रीमंत होईल, असे ठोकताळेही बांधले जात आहेत.