शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

गरज पस्तीस कोटींची, दिले पावणे तीन कोटी

By admin | Updated: March 27, 2015 23:58 IST

अभयारण्यग्रस्तांचं आंदोलन सुरूच : आजपासून चांदोलीत जाणारे रस्ते अडविणार

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वनविभागाने राज्य सरकारक डे ३५.५३ कोटींचा निधी मागितला; पण प्रत्यक्षात २.७० कोटी रुपयांचा निधी देऊन सरकारने अभयारण्यग्रस्तांची बोळवण केली आहे. परिणामी गेल्या बारा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांनी बैठक घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करणाऱ्या अभयारण्यग्रस्तांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. या चर्चेवेळी मारुती पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, चंद्रकांत चव्हाण, मारुती धोंडी पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, आजपासून चांदोली अभयारण्यात जाणारे रस्ते अडविण्यात येणार असून, पर्यटकांना आत जाण्यास मज्जाव केला जाईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी व नागरी सुविधांसाठी राज्य सरकारकडे मागणी केलेल्या ३५ कोटी ५३ लाख रुपये निधीपैकी २ कोटी ७० लाखांचा निधी कोल्हापूर वनविभागाकडे आला असून, उर्वरित निधीकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देऊन साईप्रसाद यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पहिल्या टप्प्यात नागरी सुविधा, बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मोबदला, पुनर्वसनासाठी ६५ हेक्टर जमीन तसेच जाखले गावाजवळील जमीन संपादनासाठी २ कोटी ७० लाखच्या तोकड्या निधीत काहीही होणार नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)घरबांधणी निधीचे वाटप अभयारण्यग्रस्तांना शुक्रवारी थोडा दिलासा मिळाला. जलसंपदा विभागाने घरबांधणी अनुदानापोटी प्रत्येक कुुुटुंबाला दहा हजार रुपये अ‍ॅडव्हान्सचे वाटप सुरू केले. शुक्रवारी २०० कुटुंबांना त्यांच्या बॅँक खात्यांवर ही रक्कम जमा केली, तर उर्वरित १५० कुटुंबांना लवकरच ही रक्कम दिली जाणार आहे.