शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

तिसऱ्या लाटेत दीडशे पट जास्त कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

सांगली : कोरोनाची तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दीडशे पट रुग्णसंख्या वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे ...

सांगली : कोरोनाची तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दीडशे पट रुग्णसंख्या वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व तयारी ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, तिसऱ्या लाटेत दीडशे पट रुग्णसंख्या वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. प्रशासनाने ऑक्सिजन साठवण क्षमता व ऑक्सिजन निर्मितीबाबत योग्य नियोजन करावे. दोन हजारहून अधिक ऑक्सिजनवरील रुग्ण झाल्यास परत लॉकडाऊन होईल. लक्षणे दिसताच तपासणी व औषधोपचार सुरु केले पाहिजेत. नियोजनसाठी टास्क फोर्स तयार करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधसाठा सज्ज ठेवावा. गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी घरपोच डिलिव्हरीसाठी तयारी ठेवावी.

यावेळी पाटील यांनी पूरपश्चात परिस्थितीचा आढावा घेतला. ३८ हजार ४८९ पंचनामे पूर्ण झाले आहेत. पशुधनाचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत. ३९ हजार ४०० कुटुंबांना धान्यवाटप झाले आहे. तर ३९ हजार ६९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे पंचनामे अंतिम झाल्याचे ते म्हणाले.

या बैठकीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आयुक्त नितीन कापडनीस, प्रभारी अपर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप दीक्षित, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आदी उपस्थित होते.