शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन बुधवारपासून

By admin | Updated: April 1, 2015 00:03 IST

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज द्यावेत : पाटबंधारे विभागाचे आवाहन

देवराष्ट्रे : अवकाळी पाऊस पडल्याने ताकारी उपसा सिंचन योजनेचे लांबलेले उन्हाळी आवर्तन आजपासून (बुधवारी) सुरू होत आहे. हे पाणी योजनेच्या मुख्य कालव्यातून १०७ कि.मी.पर्यंत पुढे जाणार आहे. तरीही सुरुवातीच्या गावांना अगोदर पाणी देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे आवर्तन सलग १५ दिवस सुरू राहणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.ताकारी उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाला वरदान मिळाले आहे. मात्र सुरूवातीला वीज बिलाच्या थकबाकीपोटी योजनेचे वीज कनेक्शन तोडले होते. ताकारीच्या प्रशासनाकडे वीज बिलासाठीही पैसे नसल्याने कारखान्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर महावितरणला वर्ग करण्यात आले. सध्या विक्रमी वसुली झाली असून योजनेकडे ३.५५ कोटी रुपये शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.ताकारी योजनेचा टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ मधून ८ विद्युत पंपांद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. हे पाणी मुख्य कालव्यातून १०७ कि.मी.पर्यंत नेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पाणी वितरण ० कि.मी.पासून सुरू करून २० कि.मी.पर्यंत, २०-५६ आणि ५६ ते १०० कि.मी.पर्यंत वितरित करण्यात येणार आहे.उन्हाळी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी सात क्रमांकाचा अर्ज भरून ऊस, केळी, द्राक्षबाग व इतर पिकांसाठी पाणी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी सुरू करण्यास विलंब होणार नाही. तरी लाभधारक शेतकऱ्यांनी योजनेच्या कार्यालयात पाणी मागणी अर्ज करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)विक्रमी वसुलीताकारी उपसा योजनेमुळे दुष्काळी भागाला जीवदान मिळाले आहे. सुरुवातीला थकबाकीपोटी या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रशासनाकडे कारखान्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर ते महावितरणकडे वर्ग करण्यात आले. विक्रमी वसुली झाली असून, सुमारे साडेतीन कोटी रुपये शिल्लक असल्याचे योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.