शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन बुधवारपासून

By admin | Updated: April 1, 2015 00:03 IST

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज द्यावेत : पाटबंधारे विभागाचे आवाहन

देवराष्ट्रे : अवकाळी पाऊस पडल्याने ताकारी उपसा सिंचन योजनेचे लांबलेले उन्हाळी आवर्तन आजपासून (बुधवारी) सुरू होत आहे. हे पाणी योजनेच्या मुख्य कालव्यातून १०७ कि.मी.पर्यंत पुढे जाणार आहे. तरीही सुरुवातीच्या गावांना अगोदर पाणी देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे आवर्तन सलग १५ दिवस सुरू राहणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.ताकारी उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाला वरदान मिळाले आहे. मात्र सुरूवातीला वीज बिलाच्या थकबाकीपोटी योजनेचे वीज कनेक्शन तोडले होते. ताकारीच्या प्रशासनाकडे वीज बिलासाठीही पैसे नसल्याने कारखान्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर महावितरणला वर्ग करण्यात आले. सध्या विक्रमी वसुली झाली असून योजनेकडे ३.५५ कोटी रुपये शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.ताकारी योजनेचा टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ मधून ८ विद्युत पंपांद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. हे पाणी मुख्य कालव्यातून १०७ कि.मी.पर्यंत नेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पाणी वितरण ० कि.मी.पासून सुरू करून २० कि.मी.पर्यंत, २०-५६ आणि ५६ ते १०० कि.मी.पर्यंत वितरित करण्यात येणार आहे.उन्हाळी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी सात क्रमांकाचा अर्ज भरून ऊस, केळी, द्राक्षबाग व इतर पिकांसाठी पाणी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी सुरू करण्यास विलंब होणार नाही. तरी लाभधारक शेतकऱ्यांनी योजनेच्या कार्यालयात पाणी मागणी अर्ज करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)विक्रमी वसुलीताकारी उपसा योजनेमुळे दुष्काळी भागाला जीवदान मिळाले आहे. सुरुवातीला थकबाकीपोटी या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रशासनाकडे कारखान्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर ते महावितरणकडे वर्ग करण्यात आले. विक्रमी वसुली झाली असून, सुमारे साडेतीन कोटी रुपये शिल्लक असल्याचे योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.