शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

इस्लामपुरात तिसऱ्या पर्यायाची चर्चा

By admin | Updated: May 6, 2016 01:18 IST

सत्ताधाऱ्यांकडे गर्दी : नगरपालिका निवडणुकीत प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह

अशोक पाटील --इस्लामपूर --नगरपालिका निवडणूक सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आरक्षण सोडतीही काढल्या जाणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे, तर विरोधी गटात कलह सुरू आहे. त्यासाठी तिसरा पर्याय असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.इस्लामपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना काय असेल, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. गत निवडणुकीत तीन प्रभागांचा एक प्रभाग अशा पध्दतीने निवडणुका झाल्या होत्या. मात्र यावेळी लहान प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याचे वृत्त आहे. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.सध्या पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादी ताकदीने रणांगणात उतरणार आहे, तर विरोधकांत आजही एकमत नाही. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांंंमध्ये विजय पाटील, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, संजय कोरे, सौ. अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, मनीषा पाटील, संजय कोरे यांचे प्रभाग अभेद्य आहेत, तर उर्वरित नगरसेवकांना उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या इच्छुकांनी यावेळी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याची भाषा सुरु केली आहे.उरुण परिसरात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, इस्लामपूर शहर विभागात मात्र विरोधकांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. महाडिक युवा शक्तीच्या ताकदीवर ओसवाल गु्रप, सतीश महाडिक, चेतन शिंदे, जलाल मुल्ला यांच्यासारखे मातब्बर उमेदवार राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतात, तर व्यापारी वर्गातून एल. एन. शहाही यावेळी ताकदीने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. विजय कुंभार विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत असले तरी, त्यांना विरोधकांची एकत्रित ताकद मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांना नगण्य समजत आहेत. प्रभाग रचनेनंतर इस्लामपुरातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेविषयी अद्याप कोणतेही आदेश पालिकेकडे उपलब्ध नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेविषयी आदेश येण्याची शक्यता आहे.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारीविरोधकांना घेऊनच सत्ताधाऱ्यांविरोधात शहरातील सुशिक्षित आणि चांगल्या वर्गातील उमेदवार एकत्रित करण्याचा विचार आहे. यात यश आले नाही, तर शहरात तिसरा पर्यायही असू शकेल.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.