शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

पोलीस यंत्रणा हतबल : ग्रामस्थांनीच सुरु केली रात्रगस्त

इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील वाटमारी आणि बोरगाव येथे पडलेल्या दरोड्यापासून वाळवा तालुक्यात अनेक अफवांना ऊत आला आहे. याचाच फायदा स्थानिक भुरट्या चोरट्यांनी उठविला आहे. या अफवांचा धसका महिला वर्गाने घेतला असून, त्या घराबाहेर पडण्यासही तयार नाहीत. याबाबत पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीच रात्रगस्त सुरु केली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी नंदीवाले समाज रहात असलेल्या परिसरातील उसात चोर असल्याची बातमी समजली. त्यामुळे येथील तरुणांनी उसाच्या चारही बाजूने हातात काठ्या, गुप्ती, तलवारी घेऊन पहारा दिला. उसात शिरुन पाहणी केली. परंतु हाती काही लागले नाही.वाळवा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर वाटमारीच्या अफवांना अक्षरश: ऊत आला आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. कोण म्हणते आमच्या घरावर दगड पडले, कोण म्हणते आमच्या घराचे दार वाजवले, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. हा प्रकार महिलांमधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.सध्या शेतातील कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ऊस भांगलण, पाला काढणे यासाठी महिला मजूर लागतात. परंतु गेल्या चार दिवसात उसामध्येच चोरटे दबा धरून बसत आहेत. महिलांना धमकावून ते त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेत असल्याच्याही अफवा उठल्याने महिला मजुरांनी आता शेतात काम करण्यास जाणेच बंद केले आहे.या चोरट्यांच्या अफवांमुळे आता ग्रामीण भागातील लोक रात्री ९ च्या पुढे बाहेर पडत नाहीत. नदीकाठच्या सधन गावांतून घरटी १ पुरुष रस्त्यावर पहाऱ्यासाठी येत आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत गावा-गावातून गस्त घातली जात आहे. याबाबत पोलिसांनी कळवूनही त्यांच्याकडून कसलीही कारवाई होत नाही. अथवा त्यांच्याकडून रात्रगस्तही घातली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाळवा तालुक्यातील विविध गावांमधून चोर समजून परप्रांतीय मजूर, कामगारांना मारहाण झाली आहे. (वार्ताहर)शुक्रवारी दुपारी शाहूनगर परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका युवकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीच बोलत नाही. त्यामुळे तो वेडसर असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस ठाण्यात हा वेडसर निश्चलपणे पडून होता.पिकांचे नुकसान..!ग्रामीण भागातील ऊस शेतात चोर लपले असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी उसामध्ये सोयाबीन, भुईमूग तसेच इतर कडधान्यांची पिके घेतली आहेत. चोर शोधण्यासाठी शिरलेल्या तरुणांकडून लहान पिके तुडवली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.