शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

वाळवा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

पोलीस यंत्रणा हतबल : ग्रामस्थांनीच सुरु केली रात्रगस्त

इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील वाटमारी आणि बोरगाव येथे पडलेल्या दरोड्यापासून वाळवा तालुक्यात अनेक अफवांना ऊत आला आहे. याचाच फायदा स्थानिक भुरट्या चोरट्यांनी उठविला आहे. या अफवांचा धसका महिला वर्गाने घेतला असून, त्या घराबाहेर पडण्यासही तयार नाहीत. याबाबत पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीच रात्रगस्त सुरु केली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी नंदीवाले समाज रहात असलेल्या परिसरातील उसात चोर असल्याची बातमी समजली. त्यामुळे येथील तरुणांनी उसाच्या चारही बाजूने हातात काठ्या, गुप्ती, तलवारी घेऊन पहारा दिला. उसात शिरुन पाहणी केली. परंतु हाती काही लागले नाही.वाळवा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर वाटमारीच्या अफवांना अक्षरश: ऊत आला आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. कोण म्हणते आमच्या घरावर दगड पडले, कोण म्हणते आमच्या घराचे दार वाजवले, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. हा प्रकार महिलांमधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.सध्या शेतातील कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ऊस भांगलण, पाला काढणे यासाठी महिला मजूर लागतात. परंतु गेल्या चार दिवसात उसामध्येच चोरटे दबा धरून बसत आहेत. महिलांना धमकावून ते त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेत असल्याच्याही अफवा उठल्याने महिला मजुरांनी आता शेतात काम करण्यास जाणेच बंद केले आहे.या चोरट्यांच्या अफवांमुळे आता ग्रामीण भागातील लोक रात्री ९ च्या पुढे बाहेर पडत नाहीत. नदीकाठच्या सधन गावांतून घरटी १ पुरुष रस्त्यावर पहाऱ्यासाठी येत आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत गावा-गावातून गस्त घातली जात आहे. याबाबत पोलिसांनी कळवूनही त्यांच्याकडून कसलीही कारवाई होत नाही. अथवा त्यांच्याकडून रात्रगस्तही घातली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाळवा तालुक्यातील विविध गावांमधून चोर समजून परप्रांतीय मजूर, कामगारांना मारहाण झाली आहे. (वार्ताहर)शुक्रवारी दुपारी शाहूनगर परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका युवकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीच बोलत नाही. त्यामुळे तो वेडसर असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस ठाण्यात हा वेडसर निश्चलपणे पडून होता.पिकांचे नुकसान..!ग्रामीण भागातील ऊस शेतात चोर लपले असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी उसामध्ये सोयाबीन, भुईमूग तसेच इतर कडधान्यांची पिके घेतली आहेत. चोर शोधण्यासाठी शिरलेल्या तरुणांकडून लहान पिके तुडवली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.