शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

येडेमच्छिंद्र-वांगी गटात इच्छुकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र-वांगी गटात सर्वसाधारण पुरुषाच्या दोन जागा आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र-वांगी गटात सर्वसाधारण पुरुषाच्या दोन जागा आहेत. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस होती. सहकार पॅनलने उमेदवारी निश्चित करून प्रचारात बाजी मारली आहे, तर संस्थापकने सर्व इच्छुक उमेदवारांसहित प्रचाराचा प्रारंभ केला आहे. यावेळी तिन्ही गटाकंडून येडेमच्छिंद्र व देवराष्ट्रे गावांना संधी मिळेल, अशी सभासदांतून चर्चा आहे.

येडेमच्छिंद्र-वांगी गटात वाळवा तालुक्यातील ६ व कडेगाव तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. क्रांतिसिंहांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्र येथे सुरुवातीला सहकार पॅनलकडून २१ उमेदवार इच्छुक होते. कृष्णाच्या कार्यक्षेत्रात येडेमच्छिंद्रच्या इच्छुक उमेदवारांची मोठी चर्चा होती. अखेर कासेगाव शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव बाबूराव पाटील यांनी उमेदवारीवरती आपली मोहोर उमटवीत क्रांतिसिंहांच्या साक्षीने प्रचारास सुरुवातही केली आहे.

मनोमिलन होवो अगर न होवो, सुरुवातीपासूनच रयत पॅनलकडे इच्छुक असलेल्या संजय जगन्नाथ पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित धरूनच प्रचारास सुरुवात केली आहे. संस्थापक पॅनलकडून कृष्णाचे माजी उपाध्यक्ष सुरेश गणपती पाटील व बाबासाहेब वसंतराव पाटील या दोघांनीही उमेदवारीवरती दावा करून प्रचारास सुरुवात केली आहे. दोघांचेही कार्यकर्ते उमेदवारी आपणालाच मिळणार यावरती ठाम आहेत.

सहकार पॅनलकडून अशोक मारुती देशमुख मोहित्यांचे वडगाव व देवराष्ट्रे येथील बाबासाहेब खाशाबा शिंदे यापैकी बाबासाहेब शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. रयतकडून देवराष्ट्रेचे राजाराम रामचंद्र महिंद व बापुसाहेब गणपतराव मोरे यापैकी एकाची, तर संस्थापककडून देवराष्ट्रेचेच माणिकराव आनंदराव मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. संस्थापकचे मोहित्यांचे वडगाव येथील माजी संचालक पांडुरंग मोहिते यांनीही उमेदवारीवरती प्रबळ दावा केला आहे.

चौकट

घाटमाथ्यावरील १५ गावांतून राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलचे रघुनाथ कदम यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने रयतकडून कोणाला संधी मिळते, याची प्रतीक्षा आहे. मंत्री विश्वजित कदम व युवानेते जितेश कदम हेच रयतचे घाटमाथ्यावरील सारथी असणार हे निश्चितच आहे.

चौकट

मनोमिलनाचा बार फुसका ठरल्यास तिन्ही गटांकडून घाटाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्रला प्राधान्य मिळेल, तर घाटमाथ्यावरती महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रे गावातूनच तिन्ही उमेदवार येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.