शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

आटपाडीतील शेतकऱ्यांना अवकाळीची मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST

आटपाडी : सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा अनुभव सध्या आटपाडी ...

आटपाडी

: सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा अनुभव सध्या आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. अवकाळी पाऊस आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देणार, अशी घोषणा करणाऱ्या सरकारची मदत आता शिमगा जवळ आला तरीही देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अजून किती दिवस वाट पाहायची, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.

गेल्या जूनपासूनच आटपाडी तालुक्यात विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे आणि विशेषतः डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे डाळिंबावर केलेला कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला. यावेळी शासनाकडून मदत मिळेल, ही आशा मात्र फोल ठरली.

पंचनामे होऊन सहा महिने होऊन गेले; परंतु आटपाडी तालुक्यातील अद्याप दहा गावांतील शेतकऱ्यांना एका रुपयाची शासनाने मदत केलेली नाही.

तालुक्यातील शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठ्ठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाचीवाडी आणि झरे या गावांतील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३ कोटी ४ लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.

अतिवृष्टीने ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांसाठी दहा हजार आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार हेक्टर या दराने दोन हेक्‍टर मर्यादेपर्यंतच मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला; परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

कोट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने मदत दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात २७, तर दुसऱ्या टप्प्यात २४ गावांतील शेतकऱ्यांना मदत दिली आहे. उर्वरित दहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल.

- सचिन मुळीक,

तहसीलदार, आटपाडी