शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याशिवाय जीवनात समाधान नाही

By admin | Updated: December 30, 2015 00:29 IST

जयंत पाटील : शिराळ्यात कुमार युवा साहित्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिराळा : जीवन यशस्वी होण्यासाठी जीवनात साहित्याची जोड असायला हवी. साहित्याशिवाय जीवनात समाधान लाभत नाही, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट साहित्य परिषद, मराठी अध्यापक संघाच्यावतीने आयोजित कुमार युवा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. आमदार पाटील म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना साहित्याची रुची असायला हवी. साहित्य आयुष्यात विरंगुळा देते. परंतु आजचा तरुण वाचन संस्कृतीपासून दूर जाऊ लागला आहे. बारावीनंतरच्या मुलांमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली आहे. पाठ्यपुस्तकाशिवाय अवांतर वाचन तरुणांनी केले पाहिजे, त्यांच्या मनाचा विकास त्याशिवाय होणार नाही. विराज नाईक म्हणाले की, २१ व्या शतकातील तरुणांमध्ये मन व बुद्धी सक्षम होण्यासाठी साहित्याची गरज आहे. कुमार साहित्य संमेलनामुळे ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजू लागली आहे. संस्थेचे अध्यक्ष एस. व्ही. हसबनीस म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. या संमेलनातून विद्यार्थ्यांना निश्चितच साहित्यविषयक सकारात्मक दृष्टिकोन मिळेल.यावेळी शिक्षणाधिकारी एम. आर. यादव यांचा आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लेखिका इंदुमती जोंधळे, गटशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर, विश्वप्रतापसिंग नाईक, डी. आर. महाजन, सुमन महाजन, जयवंतराव देशमुख, सौ. सुनीता नाईक, प्रा. वैजनाथ महाजन, मुख्याध्यापक एस. एस. भोसले, सरपंच गजानन सोनटक्के, भीमराव गायकवाड, विजयराव नलवडे उपस्थित होते. एस. एम. पाटील यांनी स्वागत केले. ज्योती जोशी यांनी आभार मानले. (वार्ताहर)विविध उपक्रम : ग्रंथदिंडीने उद्घाटनकुमार युवा मराठी साहित्य संमेलनानिमित्त दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शहरातून आमदार जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सोमवार पेठ, गुरुवार पेठमार्गे विष्णुपंत नगरीत ही ग्रंथदिंडी नेण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर यांच्याहस्ते करण्यात आले. एस. एम. पाटील, आर. बी. शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना चौकस, परिपूर्ण बनविण्यासाठी संमेलने उपयुक्त : मानसिंगराव नाईकमानसिंगराव नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील विद्यार्थी कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ लागले आहेत. ते चौकस, परिपूर्ण व्हावेत, यासाठी साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे.