शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

साहित्याशिवाय जीवनात समाधान नाही

By admin | Updated: December 30, 2015 00:29 IST

जयंत पाटील : शिराळ्यात कुमार युवा साहित्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिराळा : जीवन यशस्वी होण्यासाठी जीवनात साहित्याची जोड असायला हवी. साहित्याशिवाय जीवनात समाधान लाभत नाही, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट साहित्य परिषद, मराठी अध्यापक संघाच्यावतीने आयोजित कुमार युवा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. आमदार पाटील म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना साहित्याची रुची असायला हवी. साहित्य आयुष्यात विरंगुळा देते. परंतु आजचा तरुण वाचन संस्कृतीपासून दूर जाऊ लागला आहे. बारावीनंतरच्या मुलांमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली आहे. पाठ्यपुस्तकाशिवाय अवांतर वाचन तरुणांनी केले पाहिजे, त्यांच्या मनाचा विकास त्याशिवाय होणार नाही. विराज नाईक म्हणाले की, २१ व्या शतकातील तरुणांमध्ये मन व बुद्धी सक्षम होण्यासाठी साहित्याची गरज आहे. कुमार साहित्य संमेलनामुळे ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजू लागली आहे. संस्थेचे अध्यक्ष एस. व्ही. हसबनीस म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. या संमेलनातून विद्यार्थ्यांना निश्चितच साहित्यविषयक सकारात्मक दृष्टिकोन मिळेल.यावेळी शिक्षणाधिकारी एम. आर. यादव यांचा आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लेखिका इंदुमती जोंधळे, गटशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर, विश्वप्रतापसिंग नाईक, डी. आर. महाजन, सुमन महाजन, जयवंतराव देशमुख, सौ. सुनीता नाईक, प्रा. वैजनाथ महाजन, मुख्याध्यापक एस. एस. भोसले, सरपंच गजानन सोनटक्के, भीमराव गायकवाड, विजयराव नलवडे उपस्थित होते. एस. एम. पाटील यांनी स्वागत केले. ज्योती जोशी यांनी आभार मानले. (वार्ताहर)विविध उपक्रम : ग्रंथदिंडीने उद्घाटनकुमार युवा मराठी साहित्य संमेलनानिमित्त दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शहरातून आमदार जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सोमवार पेठ, गुरुवार पेठमार्गे विष्णुपंत नगरीत ही ग्रंथदिंडी नेण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर यांच्याहस्ते करण्यात आले. एस. एम. पाटील, आर. बी. शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना चौकस, परिपूर्ण बनविण्यासाठी संमेलने उपयुक्त : मानसिंगराव नाईकमानसिंगराव नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील विद्यार्थी कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ लागले आहेत. ते चौकस, परिपूर्ण व्हावेत, यासाठी साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे.