शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जातपंचायतीच्या शोषणाविरुद्ध लढा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:27 IST

सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, ...

सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, असेही ते म्हणाले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सांगलीत जयहिंद अ‍ॅकॅडमीमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाविषयक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते कायद्याच्या प्रचारासाठी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रकाशन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, प्रशिक्षण कार्यवाह सुनील स्वामी, राहुल थोरात, डॉ संजय निटवे उपस्थित होते.पाटील म्हणाले, कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे समाजातील शोषणाच्याविरोधात संविधानातील मूल्यांना अनुसरून नवीन कायदे बनवणे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन व स्थानिक प्रशासनाला कृतिशील करणे आहे, हे समजून घेतले पाहिजे.अ‍ॅड. मनीषा महाजन यांनी, हा कायदा काय आहे, याची सविस्तर माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, जातपंचायतीच्या शोषणाच्या पहिल्या बळी महिलाच असतात. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील महिलांच्या शोषणाच्या अनेक घटना समोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जातपंचायत म्हणजे केवळ एकाच जातीचा समूह नसून, मानवाधिकाराला बाधा आणणारे विविध समूह म्हणजे जात पंचायतीच आहेत. अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी जातपंचायतीच्या शोषणाविरोधात या कायद्याशिवाय भारतीय दंडविधानातील इतर कोणती कलमे लावता येतील, याची माहिती दिली.यावेळी रमेश माणगावे, रमेश वडणगेकर, शंकर कणसे, नीशा भोसले, नंदिनी जाधव, अजय भालकर, चंद्रहार माने, राधा वंजू यांच्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.अनुभवकथन...जात पंचायतीविरुद्ध समाजातील काही कुटुंबांवर अन्याय झाला. याविरुद्ध ‘अंनिस’च्या मदतीने लढा देणारी काही कुटुंबे या शिबिरास आवर्जून उपस्थित होती. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला, त्याला तोंड कसे दिले, पोलीस का मदत करीत नाहीत, याबद्दलचे अनुभव कथन केले.