शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

जातपंचायतीच्या शोषणाविरुद्ध लढा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:27 IST

सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, ...

सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, असेही ते म्हणाले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सांगलीत जयहिंद अ‍ॅकॅडमीमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाविषयक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते कायद्याच्या प्रचारासाठी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रकाशन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, प्रशिक्षण कार्यवाह सुनील स्वामी, राहुल थोरात, डॉ संजय निटवे उपस्थित होते.पाटील म्हणाले, कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे समाजातील शोषणाच्याविरोधात संविधानातील मूल्यांना अनुसरून नवीन कायदे बनवणे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन व स्थानिक प्रशासनाला कृतिशील करणे आहे, हे समजून घेतले पाहिजे.अ‍ॅड. मनीषा महाजन यांनी, हा कायदा काय आहे, याची सविस्तर माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, जातपंचायतीच्या शोषणाच्या पहिल्या बळी महिलाच असतात. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील महिलांच्या शोषणाच्या अनेक घटना समोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जातपंचायत म्हणजे केवळ एकाच जातीचा समूह नसून, मानवाधिकाराला बाधा आणणारे विविध समूह म्हणजे जात पंचायतीच आहेत. अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी जातपंचायतीच्या शोषणाविरोधात या कायद्याशिवाय भारतीय दंडविधानातील इतर कोणती कलमे लावता येतील, याची माहिती दिली.यावेळी रमेश माणगावे, रमेश वडणगेकर, शंकर कणसे, नीशा भोसले, नंदिनी जाधव, अजय भालकर, चंद्रहार माने, राधा वंजू यांच्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.अनुभवकथन...जात पंचायतीविरुद्ध समाजातील काही कुटुंबांवर अन्याय झाला. याविरुद्ध ‘अंनिस’च्या मदतीने लढा देणारी काही कुटुंबे या शिबिरास आवर्जून उपस्थित होती. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला, त्याला तोंड कसे दिले, पोलीस का मदत करीत नाहीत, याबद्दलचे अनुभव कथन केले.