शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी ; मालेवाडी पाणी पुरवठ्यात भ्रष्टाचार होऊनही कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:42 IST

१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली.

ठळक मुद्देसभासद आक्रमक : संचालक मंडळ बरखास्तीची मागणी

अशोक पाटील ।इस्लामपूर : मालेवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेत एक कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल शासकीय लेखापरीक्षक आर. बी. पाटील यांनी दिला आहे. तो येथील उपनिबंधक कार्यालयाला मिळून महिन्याहून अधिकचा काळ लोटला, तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संचालक मंडळ बरखास्त करावे, त्यांच्याकडून पैशाची वसुली करुन प्रशासक नेमावा, अशी मागणी शंकर महादेव जाधव, किरण प्रकाश माने, मंगेश भीमराव कोळेकर यांच्यासह सभासदांनी केली आहे.

१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली. मालेवाडी येथे १९९२ मध्ये राजारामबापू पाणी पुरवठा संस्थेची स्थापना झाली. या संस्थेसाठी राजारामबापू कारखाना आणि स्टेट बँकेने अर्थसाहाय्य केले होते. अल्पावधीतच म्हणजे १९९९ मध्ये संस्था कर्जमुक्त झाली.

मात्र २८ नोव्हेंबर २0१७ रोजी सभासद शंकर महादेव जाधव यांनी ८३ हजार ११९ रुपये शुल्क भरून संस्थेचे फेरलेखापरीक्षण करण्याची मागणी केली. लेखापरीक्षक आर. बी. पाटील यांनी फेरलेखापरीक्षण करून २९ सप्टेंबर २0१९ रोजी एक कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल दिला.

त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी, ही रक्कम संचालक मंडळाकडून वसूल करावी, असा आदेश उपनिबंधक इस्लामपूर यांना दिला. परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही संबंधित भ्रष्टाचारी संचालक मंडळावर कसलीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर दोषी संचालक मंडळावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा संजय पाटील, सुरेश घोरपडे, धनाजी माने, अजित माने यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे. यातून तरी प्रशासन जागे होणार का? 

संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असून या संस्थेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. दोष दुरुस्ती अहवाल देण्यास अजून मुदत आहे. संस्थेचे दोन ते तीन समित्यांकडून लेखापरीक्षण करण्यात येते. संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर आमच्याकडून अहवाल मागवण्यात आला होता. तो देण्यास विलंब झाल्यामुळे प्राप्त परिस्थितीनुसार केलेला लेखापरीक्षण अहवाल पुढे दिला. दोष दुरुस्तीचा कालावधी अजून संपलेला नसून या संस्थेत भ्रष्टाचार झाला, असे कसे म्हणता येईल?- रणजित हंबीरराव खवरे, अध्यक्ष, राजारामबापू पाणीपुरवठा संस्था, मालेवाडी.

टॅग्स :fraudधोकेबाजीwater transportजलवाहतूक