शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अवांतर वाचनाला सध्या पर्यायच नाही

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

परिसंवादातील सूर : सांगलीत ग्रंथोत्सवास प्रारंभ

सांगली : विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता, आयुष्य समृध्द करायचे असेल तर त्यांना अवांतर वाचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत ‘वाचन : एक जडणघडण’ या विषयावरील परिसंवादात आज, बुधवारी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कच्छी जैन भवन येथे आयोजित ग्रंथोत्सव प्रदर्शनात परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन होते. परिसंवादात बोलताना प्रा. डॉ. विष्णू वासमकर म्हणाले, वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिवर्तन होण्यास मदत होते. संकटकाळात आपल्याला ग्रंथाचीच साथ उपयोगी पडते. परंतु सध्या शालेय विद्यार्थी केवळ गुण मिळविण्यासाठी अमभ्यासक्रमाला लावलेल्या पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करतात. त्यांचे अवांतर वाचन कमी झाले आहे. त्यामध्ये वाढ केल्यास जीवन समृध्द होण्यास मदत होईल.प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले, अवांतर वाचनामुळे आपल्याला अनेक व्यक्तींचे अनुभव कळतात आणि त्यातून आपल्याला शिकता येते. कोल्हापूर शिक्षण विभागाचे सहायक संचालक संपत गायकवाड म्हणाले की, आयुष्याच्या परीक्षेसाठी अवांतर वाचनाला पर्याय नाही. ग्रंथाला मित्र करणे गरजेचे आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी तहान-भूक विसरुन वाचन केले पाहिजे.यावेळी प्रा. वैजनाथ महाजन यांनी, ग्रंथ वाचनाने विचार करण्याची शक्ती मिळते, याकरिता अवांतर वाचन करावे, असे आवाहन केले.(प्रतिनिधी)शाळांनी ग्रंथ वाचन उपक्रम राबवावाग्रंथ पालखीचे पूजन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार पवार आणि कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांच्याहस्ते करण्यात आले. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने, शिक्षणाधिकारी मधुकर यादव उपस्थित होते. वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी शाळांमधून ग्रंथ वाचनाचा उपक्रम राबवावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी, नागरिकांनी विविध ग्रंथांचे वाचन करुन आयुष्य समृध्द करावे, असे आवाहन केले.