शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

आश्वासने नाहीत, दिलेला शब्द पाळणार

By admin | Updated: January 15, 2015 23:22 IST

चंद्रकांत पाटील : भाजप-सेनेचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठीच

कवठेएकंद : भाजप-सेनेचे महाराष्ट्रातील सरकार सामान्यांचेच आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात अनेक समस्यांचा अभ्यास सरकारला आहे. जनतेला प्रश्न सांगण्याची गरज नाही. १५ वर्षांच्या समस्या अवघ्या ७० दिवसात संपणार नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आम्ही जुन्या सरकारसारखे आश्वासन देणार नाही. दिलेला शब्द पाळणारे आहोत, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कवठेएकंद (ता. तासगाव) येथे भाजपच्यावतीने सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. पाटील म्हणाले की, भू-विकास बँक चिंतेचाच विषय आहे. ‘भू-विकास’ला जगवता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने भू-विकासला अवसायनात काढण्याचा आदेश दिला आहे, परंतु सरकार भू-विकासच्या कर्जदारांना तणावातून मुक्त करणार आहे. एकरकमी परतफेड योजना पुन्हा राबवू. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हिताचा निर्णय घेऊ. कवठेएकंदच्या भू-विकासच्या कर्जदारांबाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ, असा शब्द देतो. यावेळी अजितराव घोरपडे, अनिल कुत्ते, बापू धोत्रे, जयवंत माळी, संदेश भंडारे, रवी मगदूम, दीपक जाधव, गणेश पुजारी, बाळासाहेब पवार, सरपंच शरद लगारे, राजकुमार लंगडे उपस्थित होते. (वार्ताहर)