शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जुन्या नोटा बदलण्याचे अद्याप आदेशच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

सांगली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार चलनातून १००, १० व ५ रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा मार्च-एप्रिलनंतर ...

सांगली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार चलनातून १००, १० व ५ रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा मार्च-एप्रिलनंतर हटविण्यात येणार आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना तोंडावर आला तरी अद्याप त्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. दुसरीकडे या जुन्या नोटांवरून व्यापारी व ग्राहकांत खटके उडत आहेत. ऐनवेळी आदेश आले तर पुन्हा या नोटा जमा करण्यासाठी लोकांना बँकांमध्ये रांगा लावाव्या लागतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी जुन्या नोटा हटविण्याबाबत माहिती दिल्यानंतर सर्वत्र नोटांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. अद्याप अग्रणी बँकेला कोणतेही आदेश आले नाहीत. दुसरीकडे या नोटांबाबत ऐनवेळी आदेश आले तर त्या जमा करण्यासाठी गाेंधळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांत या आदेशावरून चिंता व्यक्त केली जात आहे. किरकोळ व्यापारी, फेरीवाले, कामगार व गोरगरीब नागरिकांकडे अशा नोटांचे प्रमाण अधिक असल्याने व्यापाऱ्यांनी त्याबाबत विनाअट पुरेशा मुदतीत त्या बदलून देण्याची मागणी केली आहे.

चौकट

बँकांमध्येही जुन्या नोटांचे व्यवहार

एकीकडे रिझर्व्ह बँकेने या नोटा रद्दचे संकेत दिले असले तरी बँकांमधून अद्याप या नोटा वितरित केल्या जात आहेत. नोटा बदलून देण्याची प्रक्रिया अद्याप नाही. अनेक ग्राहकांकडून नोटा बदलून मिळण्याविषयी विचारणा केली जात आहे.

चौकट

बँकासुद्धा अनभिज्ञ

जिल्ह्यातील काही बँक व्यवस्थापकांनी याबाबत आम्हाला कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगितले. नोटा कधी बंद होणार, त्यांचे व्यवहार सुरू ठेवायचे की नाही, नोटा बदलून द्यायच्या का, अशा कोणत्याही गोष्टीबाबत आदेश नसल्याने बँका अनभिज्ञ आहेत.

कोट

हजार आणि पाचशेच्या नोटा अचानक रद्द करून केंद्र शासनाने यापूर्वी जनतेचे हाल केले आहेत. आता पुन्हा असे हाल करू नयेत. सध्या व्यापारात या नोटांमुळे कोणतीही समस्या नाही. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ रिझर्व्ह बँकेने दिला पाहिजे

-मुसाभाई सय्यद, अध्यक्ष जुनी भाजी मंडई, व्यापारी असोसिएशन

कोट

शासनाने आता हे नोटांचे खेळ जनतेच्या त्रासाचे करू नयेत. विनाअट नोटा परताव्याच्या व बदलाच्या अपेक्षा आहेत. ऐनवेळी आदेश काढून लोकांना रांगेत उभे करून त्यांना त्रास होईल, अशी कृती होऊ नये.

- समीर शहा, अध्यक्ष व्यापारी एकता असोसिएशन