शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

जतच्या यात्रेत पाच लाख भाविक

By admin | Updated: January 7, 2016 00:59 IST

छबिना फेऱ्यांनी सांगता : यात्रेच्या निमित्ताने दहा कोटींची उलाढाल

जत : पालखी मिरवणूक, छबिना फेऱ्या व किच कार्यक्रमाने जत येथील यल्लम्मादेवी यात्रेची बुधवारी सांगता झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुमारे पाच लाख भाविकांनी यात्रेत उपस्थिती लावली. करमणुकीची साधने, जनावरांची खरेदी-विक्री व एसटी बस वाहतूक या माध्यमातून यात्रेमध्ये सुमारे आठ ते दहा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान यल्लम्मा देवीची पालखी सवाद्य मिरवणुकीने संस्थानिक डफळे यांच्या राजवाड्यावर गेली. तेथे देवीची पूजा, ओटी भरण झाल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. जत शहरातील ठराविक मानकऱ्यांच्या घरी पूजा झाल्यानंतर पालखीच्या मार्गावरून पुजारी सुभाष कोळी (पुजारी) मंदिरात आले. तेथे त्यांनी अश्वारूढ पूजा केल्यानंतर मंदिराभोवती पालखी मिरवणुकीच्या आणि छबिन्याच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी ‘उदे ग आई यल्लम्माऽऽ’ असा जयघोष केला. भंडारा-खोबऱ्याची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. छबिना फेऱ्या व पालखीची मिरवणूक झाल्यानंतर पुजारी सुभाष कोळी यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सवाद्य मिरवणुकीने किच कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे मानकरी अरुण शिंदे यांनी बकऱ्याचा प्रतिकात्मक बळी दिला. त्यानंतर कोळी यांनी पालखीसमवेत अग्निप्रवेश केला व त्यानंतर यात्रेची सांगता झाली. संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी तसे जाहीर करून, पुढच्या यात्रेची घोषणा केली.नगरसेवक महादेव कोळी, परशुराम मोरे, माजी सरपंच सलीम गवंडी, संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन तास वाहनांच्या रांगा...भाविकांच्या परतीच्या प्रवासाने सर्वच रस्त्यांवर दोन-तीन तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किच कार्यक्रमाच्या ठिकाणी लकडकोट व्यवस्थित बांधले नव्हते. याशिवाय तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची रेटारेटी झाली. तेथे गोंधळ उडाला होता. परंतु स्वयंसेवकांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.