शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कवलापुरातील ‘तो’ बॉम्ब अखेर निकामी

By admin | Updated: July 6, 2016 00:46 IST

खंडेराजुरीत कार्यवाही : १५ फूट उंच उडाला; पाच किलोमीटरचा परिसर हादरला

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सुकुमार आष्टेकर यांच्या शेतात नांगरताना ट्रॅक्टरच्या फाळ्यात सापडलेला बॉम्ब मंगळवारी दुपारी अखेर निकामी करण्यात आला. चार महिन्यांपूर्वी तो सापडला होता. खंडेराजुरी (ता. मिरज) येथील पोलिसांच्या गोळीबार सराव केंद्राच्या मैदानात सांगलीच्या बॉम्बशोधक पथकाने हा बॉम्ब निकामी केला. तो १५ फूट हवेत उडाला. स्फोटाच्या आवाजाने चार-पाच किलो मीटरचा परिसर दणाणला.कवलापुरातील बिसूर रस्त्यावर आष्टेकर यांचे शेत आहे. ३ मार्च २०१६ रोजी शेतात ट्रॅक्टरने नांगरताना ट्रॅक्टरच्या फाळ्यामध्ये हा बॉम्ब आढळला होता. सांगलीतील बॉम्बशोधक पथकाने यंत्रसामग्री व ‘गोल्डी’ श्वानाच्या मदतीने बॉम्बची तपासणी केली. हे स्फोटक जुने असल्याचे स्पष्ट झाले होते. याचा लष्करात वापर केला जातो. चाळीस वर्षांपूर्वीचे हे स्फोटक होते. लष्करामध्ये याचा वापर विमानातून फेकून केला जातो. तसेच बंदुकीमध्येही लोड करून ते वापरले जाते. तशी पाठीमागे सोय होती. आष्टेकर यांच्या शेतात चार फूट खड्डा खोदून हा बॉम्ब ठेवला होता. याठिकाणी २४ तास पोलिसांचा शस्त्रधारी बंदोबस्त होता. परिसरात येण्यास मनाई करण्यात आली होती.सांगलीच्या बॉम्बशोधक पथकाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा बॉम्ब कवलापुरात येऊन ताब्यात घेतला. तत्पूर्वी त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो खंडेराजुरी येथे पोलिस गोळीबार सराव केंद्रावर नेण्यात आला. परिसरात येण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती. मिरज ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दुपारी दोन वाजता तो निकामी करण्यात आला. यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. तब्बल पंधरा फूट हवेत तो उडाला. यातून काळा धूर निघाला. तब्बल तीन तास ही कार्यवाही सुरू होती. (प्रतिनिधी)बॉम्ब जिवंतबॉम्ब निकामी करताना तो १५ फूट हवेत उडाला. यावरून तो जिवंत होता, हे स्पष्ट होते. ४० वर्षांपूर्वीचा हा बॉम्ब होता, अशी माहिती होती. संकेश्वरमध्येही अशाचप्रकारे २० बॉम्ब चार महिन्यांपूर्वी सापडले होते. तेही तातडीने निकामी केले होते; पण कवलापुरातील बॉम्ब निकामी करण्यासाठी तब्बल चार महिने लागले. बॉम्ब गावातून हलविल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॉम्ब असल्याने शेतात जाणे धोकादायक बनले होते. त्यामुळे शेती पडीक होती. काटेरी झुडपे उगविली होती.