शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मृत्यूनंतरही संपत नाही त्यांचे बेवारसपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

सांगली : रेल्वेच्या धडकेत मरण पावलेल्या ४३ जणांची मृत्यूनंतरही आपल्या नातेवाइकांची प्रतीक्षा थांबलेली नाही. बेवारस मयत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर ...

सांगली : रेल्वेच्या धडकेत मरण पावलेल्या ४३ जणांची मृत्यूनंतरही आपल्या नातेवाइकांची प्रतीक्षा थांबलेली नाही. बेवारस मयत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असले तरी त्यांनीही अद्याप आशा सोडलेली नाही.

जिल्ह्यात पुणे, कोल्हापूर, बंगळुरू आणि सोलापूर या चार मार्गांवर रेल्वे धावतात. त्यांच्या संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यावर आहे. अगदी साताऱ्यापर्यंतचा लोहमार्ग सांभाळावा लागतो. दररोज ७५ हून अधिक प्रवासी गाड्या व तीस ते चाळीस मालगाड्या धावतात. वाहतूक मोठी असल्याने रेल्वेच्या धडकेत मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. सरासरी आठवड्याला एक किंवा दोन मृत्यू होतात. त्यातील बहुतांश जणांची ओळख पटते, पण अनेक जण आपली ओळख न सांगताच जगाचा निरोप घेतात. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीस शेवटपर्यंत प्रयत्न करतात.

यातूनच काही आठ‌वड्यांपूर्वी एका मृताच्या नातेवाइकाचा शोध लागला. २०१८ मध्ये रेल्वेच्या धडकेत तो मरण पावला होता. पोलिसांनी ओळख पटविण्याचा बराच खटाटोप केला, पण थांग लागला नाही. अखेर स्वत:च अंत्यसंस्कार केले. दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये कागवाड पोलीस ठाण्यात एक बेपत्ताची नोंद झाली होती. तक्रारीतील वर्णन मृताशी मिळतेजुळते होते. मिरज पोलिसांनी त्याआधारे शोध घेतला असता रायबाग येथे नातेवाईक मिळून आले. पोलिसांनी मृताच्या वस्तू, छायाचित्रे नातेवाइकांच्या हवाली केली. मृत्यूनंतर का होईना, पण त्याचे बेवारसपण संपविण्यात पोलिसांना यश मिळाले.

चौकट

४३ मृतांना अजूनही नातेवाइकांचा शोध

- मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये १०६ जण रेल्वेच्या धडकेत मरण पावले, २०२० मध्ये ही संख्या ४५ होती. एकूण १५१ मृतांपैकी ४३ जणांची ओळख अजूनही पटलेली नाही.

- अर्थात यातील बहुतांश भिकारी आणि निराधार आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलीस जंगजंग पछाडतात. मृतांच्या छायाचित्रांची प्रदर्शने वर्षातून एक-दोनदा भरवली जातात. कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी छायाचित्रे चिटकवली जातात. महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांतील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेऊन त्याआधारे नातेवाइकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.

पॉइंटर्स

२०१९ मध्ये मृत्यू - १०६

अद्याप बेवारस - ३२

२०२० मध्ये मृत्यू - ४५

अद्याप बेवारस - ११

कोट

रेल्वेच्या हद्दीत मरण पावलेल्या अनोळखींवर आम्हीच अंत्यसंस्कार करतो. त्याचा खर्च रेल्वे देते. मृतांची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मृतांच्या छायाचित्रांची प्रदर्शने भरवली जातात

- सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, मिरज