शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मृत्यूनंतरही संपत नाही त्यांचे बेवारसपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

सांगली : रेल्वेच्या धडकेत मरण पावलेल्या ४३ जणांची मृत्यूनंतरही आपल्या नातेवाइकांची प्रतीक्षा थांबलेली नाही. बेवारस मयत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर ...

सांगली : रेल्वेच्या धडकेत मरण पावलेल्या ४३ जणांची मृत्यूनंतरही आपल्या नातेवाइकांची प्रतीक्षा थांबलेली नाही. बेवारस मयत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असले तरी त्यांनीही अद्याप आशा सोडलेली नाही.

जिल्ह्यात पुणे, कोल्हापूर, बंगळुरू आणि सोलापूर या चार मार्गांवर रेल्वे धावतात. त्यांच्या संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यावर आहे. अगदी साताऱ्यापर्यंतचा लोहमार्ग सांभाळावा लागतो. दररोज ७५ हून अधिक प्रवासी गाड्या व तीस ते चाळीस मालगाड्या धावतात. वाहतूक मोठी असल्याने रेल्वेच्या धडकेत मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. सरासरी आठवड्याला एक किंवा दोन मृत्यू होतात. त्यातील बहुतांश जणांची ओळख पटते, पण अनेक जण आपली ओळख न सांगताच जगाचा निरोप घेतात. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीस शेवटपर्यंत प्रयत्न करतात.

यातूनच काही आठ‌वड्यांपूर्वी एका मृताच्या नातेवाइकाचा शोध लागला. २०१८ मध्ये रेल्वेच्या धडकेत तो मरण पावला होता. पोलिसांनी ओळख पटविण्याचा बराच खटाटोप केला, पण थांग लागला नाही. अखेर स्वत:च अंत्यसंस्कार केले. दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये कागवाड पोलीस ठाण्यात एक बेपत्ताची नोंद झाली होती. तक्रारीतील वर्णन मृताशी मिळतेजुळते होते. मिरज पोलिसांनी त्याआधारे शोध घेतला असता रायबाग येथे नातेवाईक मिळून आले. पोलिसांनी मृताच्या वस्तू, छायाचित्रे नातेवाइकांच्या हवाली केली. मृत्यूनंतर का होईना, पण त्याचे बेवारसपण संपविण्यात पोलिसांना यश मिळाले.

चौकट

४३ मृतांना अजूनही नातेवाइकांचा शोध

- मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये १०६ जण रेल्वेच्या धडकेत मरण पावले, २०२० मध्ये ही संख्या ४५ होती. एकूण १५१ मृतांपैकी ४३ जणांची ओळख अजूनही पटलेली नाही.

- अर्थात यातील बहुतांश भिकारी आणि निराधार आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलीस जंगजंग पछाडतात. मृतांच्या छायाचित्रांची प्रदर्शने वर्षातून एक-दोनदा भरवली जातात. कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी छायाचित्रे चिटकवली जातात. महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांतील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेऊन त्याआधारे नातेवाइकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.

पॉइंटर्स

२०१९ मध्ये मृत्यू - १०६

अद्याप बेवारस - ३२

२०२० मध्ये मृत्यू - ४५

अद्याप बेवारस - ११

कोट

रेल्वेच्या हद्दीत मरण पावलेल्या अनोळखींवर आम्हीच अंत्यसंस्कार करतो. त्याचा खर्च रेल्वे देते. मृतांची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मृतांच्या छायाचित्रांची प्रदर्शने भरवली जातात

- सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, मिरज