शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी, टेंभू सिंचन योजनांचे ५.३८ कोटी वीज बिल थकित

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

वीज पुरवठा खंडित : बिल न भरल्याने महावितरणची कारवाई

प्रताप महाडिक - कडेगाव -ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेची २ कोटी ८८ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी अद्याप भरलेली नाही. त्यामुळे महावितरणने योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. शासनाने टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची दोन कोटी साठ लाख, तर सप्टेंबरअखेरची नियमित आवर्तनाची २८ लाख अशी एकंदरीत २ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे. रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनास विलंब होत आहे.मागीलवर्षी तत्कालीन मदत कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेऊन राज्याच्या टंचाई उपाययोजनांची मुदतही वाढविली आणि सप्टेंबरपर्यंत टंचाई निधीतून योजनेची आवर्तनेही दिली. परंतु या आवर्तनांची २ कोटी ६० लाख रुपयांची वीज बिल थकबाकी अद्याप शासनाकडून येणे आहे. आता राज्यात भाजपचे सरकार आहे. शासनाने टंचाई काळातील वीज बिल भरावे. १ डिसेंबरपर्यंत पहिले आवर्तनकार्यकारी अभियंता संजय डोईफोडे म्हणाले की, ताकारी योजनेची यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू आहे. कारखानदारांकडून येणेबाकी असलेली १ कोटी रुपयांची पाणीपट्टीची रक्कम दोन दिवसात मिळेल. १९ नोव्हेंबरपर्यंत ही वीज बिल थकबाकी मिळावी, असे शासनास कळविले आहे. १ डिसेंबरपर्यंत यावर्षीचे व रब्बी हंगामातील आवर्तन देणार आहे.टेंभू योजनेचीही टंचाई उपाययोजना निधीतून आवर्तने दिली होती. दुष्काळसदृृश परिस्थितीत लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरून घेतले होते. आता या आवर्तनाची २ कोटी ५० लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे. यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे, अशी माहिती टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी झेंगटे यांनी सांगितली.