शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना अडीच महिन्यांनी पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST

सांगली : कोरोनामुळे शाळा बंद असून, पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यातील पहिली ते ...

सांगली : कोरोनामुळे शाळा बंद असून, पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या दोन लाख २७ हजार ५२६ विद्यार्थ्यांसाठी बारा लाख सहा हजार २३३ पुस्तकांच्या प्रती मिळाल्या आहेत. पलूस तालुका वगळता अन्य नऊ जिल्ह्यांना पुस्तके मिळाल्याचा दावा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. मात्र थोड्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलेच आहे. घरातील पालकांनी मुलांना शिकवायचे म्हटले तर जिल्हा परिषदेकडून अडीच महिने झाले तरी पुस्तकांचे वाटपच झाले नाही. तथापि प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार पुस्तकांचे तालुक्यांच्या ठिकाणी वाटप झाले आहे. तेथून शाळांना वाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुस्तके मिळालीच नाहीत, असे सांगितले.

चौकट

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या, मिळालेली पाठ्यपुस्तके

तालुका विद्यार्थी संख्या मिळालेली पुस्तके

वाळवा ३८६७१ २१४४९४

आटपाडी १५०७९ ८१०९२

मिरज ३१३२३ १६९९८५

तासगाव २३६८९ १२६४५६

खानापूर १६१५० ८६४१९

शिराळा १४८५५ ८२७४५

क.महांकाळ १६२६७ ८४९५५

जत ४४३६३ २५४३८०

पलूस १४२४८ ३५७६९

कडेगाव २२७५२६ १२०६२३३

कोट

पलूस तालुक्याचा एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेत समावेश झालेला आहे. तेथील पहिली ते आठवीच्या १४ हजार २४८ विद्यार्थ्यांसाठी १३ हजार १५३ पाठ्यपुस्तक संच आठ दिवसांत मिळणार आहेत. उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये पुस्तके मिळाली आहेत. सेमी इंग्रजीच्या पुस्तकांचेही वाटप झाले आहे.

संतोष ढवळे, कार्यक्रम अधिकारी, सर्व शिक्षा अभियान

कोट

अनेक शाळांमध्ये अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. विद्यार्थी व पालकांकडून शिक्षकांकडे वारंवार मागणी होत आहे. रोज काय उत्तरे द्यायची, असा शिक्षकांना प्रश्न पडत आहे. शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पुस्तके त्वरित मिळावीत.

-बाबासाहेब लाड, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती.