शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट सर्व पूरग्रस्तांना दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST

सांगली : गेल्या महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या सर्व घटकांना दिलासा देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या अटीमध्ये शिथिलता ...

सांगली : गेल्या महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या सर्व घटकांना दिलासा देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या अटीमध्ये शिथिलता देत पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या कुटुंबालाही आता दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, पुरामुळे बाधित व स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना कपड्यांकरिता पाच हजार रुपये व घरगुती भांडी, वस्तूंकरिता पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य देण्यात येत होते. यामध्ये ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता घर पाण्यात बुडाले असल्याची अट होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून, पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही दहा हजार रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुरात पूर्ण नष्ट झालेल्या घरासाठी दीड लाख रुपये, ५० टक्के पडझड झालेल्या घरांसाठी ५० हजार, २५ टक्के पडझडसाठी २५ हजार, १५ टक्के पडझडसाठी १५, नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी १५ हजारांची मदत करण्यात येणार आहे. नोंदणीकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के अथवा ५० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. टपरीधारकांना दहा हजार, तर कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

चौकट

मृत दुधाळ जनावरांसाठी ४० हजार, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३० हजार, ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी २० हजार, मेंढी, बकरीसाठी चार हजार, कुक्कुटपालन प्रतिपक्षी ५० रुपये मदत देण्यात येणार आहे. मत्स बोटी व जाळीच्या नुकसानासाठी दहा हजार, बोटीच्या नुकसानीला २५ हजार, तर फक्त जाळ्यांच्या नुकसानीला पाच हजारांची मदत करण्यात येणार आहे.