शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

सरसकट सर्व पूरग्रस्तांना दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST

सांगली : गेल्या महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या सर्व घटकांना दिलासा देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या अटीमध्ये शिथिलता ...

सांगली : गेल्या महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या सर्व घटकांना दिलासा देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या अटीमध्ये शिथिलता देत पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या कुटुंबालाही आता दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, पुरामुळे बाधित व स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना कपड्यांकरिता पाच हजार रुपये व घरगुती भांडी, वस्तूंकरिता पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य देण्यात येत होते. यामध्ये ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता घर पाण्यात बुडाले असल्याची अट होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून, पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही दहा हजार रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुरात पूर्ण नष्ट झालेल्या घरासाठी दीड लाख रुपये, ५० टक्के पडझड झालेल्या घरांसाठी ५० हजार, २५ टक्के पडझडसाठी २५ हजार, १५ टक्के पडझडसाठी १५, नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी १५ हजारांची मदत करण्यात येणार आहे. नोंदणीकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के अथवा ५० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. टपरीधारकांना दहा हजार, तर कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

चौकट

मृत दुधाळ जनावरांसाठी ४० हजार, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३० हजार, ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी २० हजार, मेंढी, बकरीसाठी चार हजार, कुक्कुटपालन प्रतिपक्षी ५० रुपये मदत देण्यात येणार आहे. मत्स बोटी व जाळीच्या नुकसानासाठी दहा हजार, बोटीच्या नुकसानीला २५ हजार, तर फक्त जाळ्यांच्या नुकसानीला पाच हजारांची मदत करण्यात येणार आहे.