शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या गैरव्यवस्थापनाने ‘ताकारी’ बंद

By admin | Updated: April 19, 2016 00:56 IST

गरजेपेक्षा जादा पाणीसाठा : ‘ताकारी’ची पाणी पातळी खालावली

प्रताप महाडिक--कडेगाव -टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे ताकारी योजना अचानक बंद झाली. चालूवर्षी सलग तिसऱ्या आवर्तनालाही असा प्रकार घडल्यामुळे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील टेंभू येथील पाणी साठवण बंधाऱ्यात गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून टेंभूच्या अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवले आहे. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे ताकारी उपसा सिंचन योजना अचानकपणे रविवारी सायंकाळी पाच वाजता बंद पडली.ताकारी व टेंभू या दोन्ही सिंचन योजनांसाठी कोयना धरणातून पाणी सोडले जाते. ताकारी तसेच टेंभू योजना आणि कृष्णा नदीवरील अन्य सर्व पाणी वितरण व व्यवस्थापनाचे अधिकार सांगली पाटबंधारे विभागाकडे दिले आहेत. ताकारी व टेंभू या दोन्ही योजना आवर्तनासाठी आवश्यक पाणी मागणी सांगली पाटबंधारे विभागाकडे करतात. योजनांच्या मागणीप्रमाणे सांगली विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडले जाते. सोडलेले पाणी प्रथम टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील पाणी साठवण बंधाऱ्यात जाते. टेंभू बंधाऱ्यात गरजेप्रमाणे आवश्यक पाणी पातळी ठेवून ताकारी तसेच कृष्णा नदीवरील अन्य उपशासाठी जादा आलेले पाणी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या साठवण बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पुढे सोडणे गरजेचे आहे. तशा सूचना सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारीने देतात. यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक पाणीसाठा या योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात होतो. परंतु सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन न करता टेंभू योजनेचे अधिकारी आवश्यकतेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. यामुळे ताकारी योजनेला आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर पाणी पातळी साटपेवाडी बंधाऱ्यात मिळत नाही. काल, रविवारी सायंकाळी पाच वाजता ताकारी योजनेची पाणी पातळी खालावली आणि योजना बंद पडली. मागील दोन्ही आर्वतनातही अशाप्रकारे ताकारी योजना बंद पडली, याला टेंभूचे गैरव्यवस्थापनच कारणीभूत आहे.ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊन महिना झाला. ताकारीचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यातील विसापूरच्या जवळपास पोहोचले होते. आता योजना अचानक बंद झाली. मुख्य कालवा कोरडा पडला आहे. आता पुन्हा योजना सुरू करून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. या दोन्ही दिवसातील पाण्याचा अपव्यय आणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही न करणाऱ्या टेंभूच्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे. ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभागामार्फत ताकारीची आवर्तने नियमित मिळत असताना आणि पाणीपट्टी वसुली चांगली असताना असे कृत्रिम अडथळे निर्माण होत असल्यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिकारी बेजबाबदार : कारवाईची मागणीऐन दुष्काळात जबाबदारीचे भान ठेवून टेंभूचे अधिकारी काम करीत नाहीत. सांगली विभागाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करीत नाहीत. गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून ठेवत आहेत. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणीपातळी खालावली आणि ताकारी योजना बंद पडली. ही घटना सलग तीन आर्वतनात घडली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.