शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शिक्षकांच्या बदल्या फेब्रुवारीपर्यंत न करण्याची शिक्षक समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 17:53 IST

फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सांगली , दि.६ : सध्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत अस्थिर वातावरण आहे. बदल्यांच्या यादीतही मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला आहे. शिक्षक समितीने उच्च न्यायालयात बदल्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, शिक्षकांच्या बदल्यांबाबत समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.

यासंदर्भात वकिलांचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास सचिवांना दिले जाणार आहे. न्यायालयाचा आदेश असल्याने फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही बदल्या करता येणार नाहीत. अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असेही ते म्हणाले.

शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. बदल्यांच्या याद्याही सदोष आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या २९५ बदल्यांसंदर्भात दीडशे शिक्षकांनी हरकत नोंदवली आहे.

बदल्यांना स्थगिती असल्याने शिक्षकांनीही भयभीत होऊ नये. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी सर्व संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षकांच्या बदल्या करण्यास समितीकडून विरोध केला जाईल, असेही किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले.