शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शिक्षकांच्या बदल्या फेब्रुवारीपर्यंत न करण्याची शिक्षक समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 17:53 IST

फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सांगली , दि.६ : सध्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत अस्थिर वातावरण आहे. बदल्यांच्या यादीतही मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला आहे. शिक्षक समितीने उच्च न्यायालयात बदल्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, शिक्षकांच्या बदल्यांबाबत समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.

यासंदर्भात वकिलांचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास सचिवांना दिले जाणार आहे. न्यायालयाचा आदेश असल्याने फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही बदल्या करता येणार नाहीत. अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असेही ते म्हणाले.

शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. बदल्यांच्या याद्याही सदोष आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या २९५ बदल्यांसंदर्भात दीडशे शिक्षकांनी हरकत नोंदवली आहे.

बदल्यांना स्थगिती असल्याने शिक्षकांनीही भयभीत होऊ नये. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी सर्व संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षकांच्या बदल्या करण्यास समितीकडून विरोध केला जाईल, असेही किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले.