शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तासगावचा ‘बाहुबली’ ठरणार झेडपीच्या पटावर

By admin | Updated: November 5, 2015 23:59 IST

वर्चस्वासाठी संघर्ष : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक संस्थांमध्ये व्यूहरचना

दत्ता पाटील-तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाले. निवडणूक निकालानंतरही वर्चस्ववादाचा मुद्दा तालुक्यात धुमसत आहेच. यश मिळाले तरी, त्याचे निर्भेळ श्रेय दोन्ही नेत्यांना घेता आले नाही. वर्चस्वासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहेच. तोपर्यंत तालुक्यातील राजकीय संघर्ष कायम राहणार असून, त्यासाठीच्या व्यूहरचनेची या निवडणुकीतच चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्याचे बाहुबली कोण? याचे उत्तर झेडपीच्या आखाड्यात मिळणार आहे.तासगाव तालुक्याच्या ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रवादीच्या काही ग्रामपंचायती कमी झाल्या, तरी संख्यात्मकदृष्ट्या वर्चस्व कायम राहिले. भाजपच्या किंबहुना खासदार संजयकाका पाटील गटाच्या ग्रामपंचायतींची संख्या वाढली. यापूर्वी असलेले आबा गटाचे एकहाती वर्चस्वाचे चित्र बदलण्यात खासदार पाटील यांना यश मिळाले. त्यातूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाचा श्रेयवाद सुरू झाला. निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात ‘वर्चस्व आमच्याच गटाचे‘ असा दावा केला जात आहे. कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत. निवडणुका झाल्यानंतरही कोणत्याच नेत्याला विजयाचा आस्वाद घेता आला नाही, हे उघड सत्य नेत्यांच्याच भूमिकेतून दिसून येत आहे.तालुक्यावर वर्चस्व ठरेल, असा ग्रामपंचायतींचा एकहाती निकाल लागला नाही. त्यामुळे दीड वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यावर कोणाचे वर्चस्व, हे दाखवून देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यापूर्वीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सलग दोन निवडणुका आबा आणि काका गटाने एकत्रित लढवल्या होत्या. दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांत मात्र तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असणार आहे. आबांच्या पश्चात बदललेली समीकरणे आणि आमदार, खासदारांचा श्रेयवाद, यामुळेच या निवडणुकांत अधिक रंगत असणार आहे. तालुक्यातील वर्चस्व सिध्द करून दाखविण्यासाठी या निवडणुका दोन्ही नेत्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्याचीच रंगीत तालीम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झाली आहे. तालुक्यातील सहा महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांपैकी यावेळी मांजर्डे, सावळज, विसापूर आणि येळावी याठिकाणच्या निवडणुका झाल्या. विसापूर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांनी फारकत घेतल्यानंतरही या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले. मांजर्डेचा गड कायम राखण्यात यश मिळाले. मात्र येळावीचा बालेकिल्ला सुफडासाफ झाला, तर आबांचे होमग्राऊंड असलेल्या सावळजमध्ये राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांशी हातमिळवणी करुन भाजपने ग्रामपंचायतीच्या सत्तेत शिरकाव केला. आता तालुक्यात बाहुबली कोण? हे दाखवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यासाठीची तालीम आतापासूनच घुमणार, हे निश्चित.मागील निवडणूक : जागा वाटपाचा फॉर्म्युलातालुक्यावर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे वर्चस्व जास्त असल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या जागा वाटपात आबा गटाकडेच बहुतांश जागा होत्या. सहापैकी चार जिल्हा परिषदेच्या आणि आठ पंचायत समितीच्या जागा आबा गटाकडे, तर दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागा काका गटाकडे, असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र मणेराजुरी जिल्हा परिषद गटात आबा गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेसह दोन पंचायत समितीच्या जागा काका गटाला गमवाव्या लागल्या होत्या.स्थानिक स्वराज्य संस्थांवर एक नजरमाजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) गटाचे जिल्हा परिषदेचे पाच, तर दहा पंचायत समिती सदस्य आहेतखासदार संजयकाका पाटील गटाचा समर्थक एक सदस्य आहे. पंचायत समितीचे दोन सदस्य आहेत.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.वर्चस्वाचा श्रेयवादभाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाचा श्रेयवाद सुरू झाला. निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात ‘वर्चस्व आमच्याच गटाचे‘ असा दावा केला जात आहे. कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत.