शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावचा ‘बाहुबली’ ठरणार झेडपीच्या पटावर

By admin | Updated: November 5, 2015 23:59 IST

वर्चस्वासाठी संघर्ष : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक संस्थांमध्ये व्यूहरचना

दत्ता पाटील-तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाले. निवडणूक निकालानंतरही वर्चस्ववादाचा मुद्दा तालुक्यात धुमसत आहेच. यश मिळाले तरी, त्याचे निर्भेळ श्रेय दोन्ही नेत्यांना घेता आले नाही. वर्चस्वासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहेच. तोपर्यंत तालुक्यातील राजकीय संघर्ष कायम राहणार असून, त्यासाठीच्या व्यूहरचनेची या निवडणुकीतच चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्याचे बाहुबली कोण? याचे उत्तर झेडपीच्या आखाड्यात मिळणार आहे.तासगाव तालुक्याच्या ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रवादीच्या काही ग्रामपंचायती कमी झाल्या, तरी संख्यात्मकदृष्ट्या वर्चस्व कायम राहिले. भाजपच्या किंबहुना खासदार संजयकाका पाटील गटाच्या ग्रामपंचायतींची संख्या वाढली. यापूर्वी असलेले आबा गटाचे एकहाती वर्चस्वाचे चित्र बदलण्यात खासदार पाटील यांना यश मिळाले. त्यातूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाचा श्रेयवाद सुरू झाला. निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात ‘वर्चस्व आमच्याच गटाचे‘ असा दावा केला जात आहे. कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत. निवडणुका झाल्यानंतरही कोणत्याच नेत्याला विजयाचा आस्वाद घेता आला नाही, हे उघड सत्य नेत्यांच्याच भूमिकेतून दिसून येत आहे.तालुक्यावर वर्चस्व ठरेल, असा ग्रामपंचायतींचा एकहाती निकाल लागला नाही. त्यामुळे दीड वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यावर कोणाचे वर्चस्व, हे दाखवून देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यापूर्वीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सलग दोन निवडणुका आबा आणि काका गटाने एकत्रित लढवल्या होत्या. दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांत मात्र तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असणार आहे. आबांच्या पश्चात बदललेली समीकरणे आणि आमदार, खासदारांचा श्रेयवाद, यामुळेच या निवडणुकांत अधिक रंगत असणार आहे. तालुक्यातील वर्चस्व सिध्द करून दाखविण्यासाठी या निवडणुका दोन्ही नेत्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्याचीच रंगीत तालीम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झाली आहे. तालुक्यातील सहा महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांपैकी यावेळी मांजर्डे, सावळज, विसापूर आणि येळावी याठिकाणच्या निवडणुका झाल्या. विसापूर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांनी फारकत घेतल्यानंतरही या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले. मांजर्डेचा गड कायम राखण्यात यश मिळाले. मात्र येळावीचा बालेकिल्ला सुफडासाफ झाला, तर आबांचे होमग्राऊंड असलेल्या सावळजमध्ये राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांशी हातमिळवणी करुन भाजपने ग्रामपंचायतीच्या सत्तेत शिरकाव केला. आता तालुक्यात बाहुबली कोण? हे दाखवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यासाठीची तालीम आतापासूनच घुमणार, हे निश्चित.मागील निवडणूक : जागा वाटपाचा फॉर्म्युलातालुक्यावर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे वर्चस्व जास्त असल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या जागा वाटपात आबा गटाकडेच बहुतांश जागा होत्या. सहापैकी चार जिल्हा परिषदेच्या आणि आठ पंचायत समितीच्या जागा आबा गटाकडे, तर दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागा काका गटाकडे, असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र मणेराजुरी जिल्हा परिषद गटात आबा गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेसह दोन पंचायत समितीच्या जागा काका गटाला गमवाव्या लागल्या होत्या.स्थानिक स्वराज्य संस्थांवर एक नजरमाजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) गटाचे जिल्हा परिषदेचे पाच, तर दहा पंचायत समिती सदस्य आहेतखासदार संजयकाका पाटील गटाचा समर्थक एक सदस्य आहे. पंचायत समितीचे दोन सदस्य आहेत.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.वर्चस्वाचा श्रेयवादभाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाचा श्रेयवाद सुरू झाला. निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात ‘वर्चस्व आमच्याच गटाचे‘ असा दावा केला जात आहे. कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत.