शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तासगावची ४९ गावे आता पाणीदार- अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:42 IST

तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत

तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत पानी फौंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले. स्पर्धेत तासगाव तालुक्यातील ४९ गावांनी सहभाग दाखवला असून, आपले गाव पाणीदार करण्याचा निर्धार यावेळी केला.तासगाव तहसील कार्यालयाच्यावतीने येथील बहुउद्देशीय हॉल येथे पानी फौंडेशन संचलित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तासगाव तालुक्यातील ४९ गावांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण आणि कार्यशाळेत डॉ. अविनाश पोळ बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी अरुण जाधव, सहायक निबंधक शंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, श्री. ननावरे आदी उपस्थित होते.वॉटर कप स्पर्धेत तासगाव तालुक्यातील ४९ गावांनी सहभाग दाखवला आहे. याच गावांपैकी चिखलगोठण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील यांच्यासह प्रशिक्षण केलेल्या लोकांशी डॉ. अविनाश पोळ यांनी थेट सुसंवाद साधला.डॉ. पोळ म्हणाले, गावामध्ये एकजुटीने काम केल्यास गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट रोपे लावणे आवश्यक आहे. चिखलगोठण येथील मंडळींनी पाच हजार रोपे लावली आहेत. प्रतिमाणसी ६ घनमीटर काम होणे आवश्यक आहे; नाही तर आपला भाग काही वर्षांत वाळवंटाकडे जाऊ शकतो. यासाठी आपल्या शेतातील माती वाहून जाणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून माती टिकण्यासाठी बांध-बंदिस्तीचे काम प्राधान्याने होणे आवश्यक आहे. तसेच शेतात पडणारे पाणी त्याच भागात जिरवले तर, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होईल.तसेच काही कामांसाठी भारतीय जैन संघाच्यावतीने २५० तास पोकलॅन व जेसीबी दिला जाणार असून यासाठी डिझेलचा खर्च फक्त गावाने करावयाचा आहे. वॉटर स्पर्धा ही आनंद यात्रा समजून यश मिळवावे व आपले गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले.

यावेळी डॉ. विकास खरात यांनी, शासनाने चार वर्षांपूर्वी जलयुक्त योजना सुरू केली आहे. आज पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी केवळ २० टक्केच पावसाचे पाणी उपयुक्त ठरत आहे अन्यथा ८० टक्के पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्या भागातच मुरवले, तर दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही असे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेसाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे असे सांगून, डॉ. खरात म्हणाले, तालुक्यातील १४२६ शौचखड्ड्यांना मान्यता दिली असून त्याचे पैसे येत्या आठवड्यात खात्यावर जमा होतील.

तालुका कृषी अधिकारी आर. बी. श्ािंदे यांनी, तालुक्यात गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होत आहे असे सांगून, जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी तालुक्यात झाली असल्याचे सांगितले. ननावरे यांनी, चांगल्या अधिकाºयांचा फायदा करून घ्यावा असे सांगून, योग्य नियोजन करावे, असे सांगितले. तहसीलदार सुधाकर भोसले यांनी प्रास्ताविकात, या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी काम कसे करावे, नियोजन कसे करावे याची माहिती विषद क रून, पाण्यासाठी एकजुटीने काम केल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यास मदत होईल असेही सांगितले. तसेच गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार याबाबतची माहितीही तहसीलदारांनी दिली.यावेळी तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत ४९ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीसपाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली