शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तासगावची ४९ गावे आता पाणीदार- अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:42 IST

तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत

तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत पानी फौंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले. स्पर्धेत तासगाव तालुक्यातील ४९ गावांनी सहभाग दाखवला असून, आपले गाव पाणीदार करण्याचा निर्धार यावेळी केला.तासगाव तहसील कार्यालयाच्यावतीने येथील बहुउद्देशीय हॉल येथे पानी फौंडेशन संचलित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तासगाव तालुक्यातील ४९ गावांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण आणि कार्यशाळेत डॉ. अविनाश पोळ बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी अरुण जाधव, सहायक निबंधक शंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, श्री. ननावरे आदी उपस्थित होते.वॉटर कप स्पर्धेत तासगाव तालुक्यातील ४९ गावांनी सहभाग दाखवला आहे. याच गावांपैकी चिखलगोठण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील यांच्यासह प्रशिक्षण केलेल्या लोकांशी डॉ. अविनाश पोळ यांनी थेट सुसंवाद साधला.डॉ. पोळ म्हणाले, गावामध्ये एकजुटीने काम केल्यास गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट रोपे लावणे आवश्यक आहे. चिखलगोठण येथील मंडळींनी पाच हजार रोपे लावली आहेत. प्रतिमाणसी ६ घनमीटर काम होणे आवश्यक आहे; नाही तर आपला भाग काही वर्षांत वाळवंटाकडे जाऊ शकतो. यासाठी आपल्या शेतातील माती वाहून जाणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून माती टिकण्यासाठी बांध-बंदिस्तीचे काम प्राधान्याने होणे आवश्यक आहे. तसेच शेतात पडणारे पाणी त्याच भागात जिरवले तर, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होईल.तसेच काही कामांसाठी भारतीय जैन संघाच्यावतीने २५० तास पोकलॅन व जेसीबी दिला जाणार असून यासाठी डिझेलचा खर्च फक्त गावाने करावयाचा आहे. वॉटर स्पर्धा ही आनंद यात्रा समजून यश मिळवावे व आपले गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले.

यावेळी डॉ. विकास खरात यांनी, शासनाने चार वर्षांपूर्वी जलयुक्त योजना सुरू केली आहे. आज पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी केवळ २० टक्केच पावसाचे पाणी उपयुक्त ठरत आहे अन्यथा ८० टक्के पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्या भागातच मुरवले, तर दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही असे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेसाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे असे सांगून, डॉ. खरात म्हणाले, तालुक्यातील १४२६ शौचखड्ड्यांना मान्यता दिली असून त्याचे पैसे येत्या आठवड्यात खात्यावर जमा होतील.

तालुका कृषी अधिकारी आर. बी. श्ािंदे यांनी, तालुक्यात गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होत आहे असे सांगून, जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी तालुक्यात झाली असल्याचे सांगितले. ननावरे यांनी, चांगल्या अधिकाºयांचा फायदा करून घ्यावा असे सांगून, योग्य नियोजन करावे, असे सांगितले. तहसीलदार सुधाकर भोसले यांनी प्रास्ताविकात, या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी काम कसे करावे, नियोजन कसे करावे याची माहिती विषद क रून, पाण्यासाठी एकजुटीने काम केल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यास मदत होईल असेही सांगितले. तसेच गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार याबाबतची माहितीही तहसीलदारांनी दिली.यावेळी तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत ४९ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीसपाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली