शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तासगाव विकासाची सत्ताधाऱ्यांतर्फे पालखी

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

खासदारांकडून भ्रमनिरास : नगराध्यक्षांच्या खांदेपालटाने विकासाला खोडा

दत्ता पाटील- तासगाव -नगरसेवकांची नाराजी रोखण्यासाठी नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची केली. साडेतीन वर्षापर्यंत ही परंपरा कायम राहिली. आता तोच पायंडा, भाजपचा झेंडा फडकवून सत्ता ताब्यात घेतलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्याकडूनही कायम राहिला आहे. येणारा प्रत्येक नगराध्यक्ष आश्वासनांच्या बाबतीत जुन्याच नगराध्यक्षांचा कित्ता गिरवत आहे. नगराध्यक्ष पदाच्या खांदेपालटाने शहराचा विकास आणि समस्यांना खोडा बसला आहे. पालिकेत सत्ता कोणाचीही असली तरी, सत्ताधाऱ्यांकडून शहर विकासाची पालखीच झाल्याचे चित्र आहे.तासगाव नगरपालिकेची चार वर्षापूर्वी झालेली निवडणूक आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांनी एकत्रित येत लढवली. दोन्ही नेत्यांवर विश्वास टाकून तासगावकरांनी एकहाती सत्ता सोपवली. सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच खुर्चीची महत्त्वाकांक्षा असलेल्या नगरसेवकांनी नेत्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांकडूनही नगराध्यक्ष पदाचे तुकडे पाडण्यास सुरुवात केली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना त्यासाठी कसरत करावी लागली. तरीदेखील त्यांना नाराजीचा फटका बसलाच. परिणामी, विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकालाही नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली. आर. आर. पाटील यांच्या पश्चातदेखील नगराध्यक्ष पदाच्या महत्त्वाकांक्षेचे धक्के आबा गटाला सहन करावे लागले. त्यातूनच पालिकेत आबा गटाची धुळदाण झाली. पालिकेत राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांना गळ टाकून, खासदार संजयकाका पाटील यांनी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा वर्षानुवर्षे काका समर्थक म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली. मात्र साळुंखे खुर्चीवर विराजमान होताच महिन्याभरासाठी आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून महिना होत नाही तोच, त्यांना पायउतार व्हावे लागले.सत्तेची सूत्रे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे आल्यानंतर तरी किमान नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची थांबेल, अशी जनतेला अपेक्षा होती. मात्र खासदारांकडूनही याबाबत भ्रमनिरास झाला असून, नगरसेवकांच्या मर्जीसाठी पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असेच धोरण अवलंबले आहे. गेल्या काही वर्षांत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रत्येक नगराध्यक्षाकडून तासगावच्या विकासाचे व्हिजन जाहीर केले जाते. शहर विकासाचा अजेंडा जाहीर होतो. शहरातील समस्या आणि त्या मार्गी लावण्याबाबत आश्वासनांची खैरात होते. मात्र त्यांची पूर्तता कोणत्याच नगराध्यक्षाकडून होत नाही. नगराध्यक्ष नवा, मात्र प्रश्न तेच, असाच एकूण पालिकेच्या कारभाराचा रागरंग आहे. पालिकेच्या कारभाराच्या जत्रेत नगराध्यक्षांकडून केवळ आश्वासनांची पालखीच वाहिली जात आहे. ही पालखी विकासाच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचणार? आणि कोण पोहोचवणार? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. डी. एम. पाटील यांच्यानंतर कोण ?माजी नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी तासगाव शहरात खऱ्याअर्थाने विकास कामांना सुरुवात केली. त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सलग सहा वर्षे काम केले. त्यानंतरही चार वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम केले. एकहाती कारभार करता आल्यामुळे त्यांच्या काळात शिक्षण मंडळ स्थापना, सिध्देश्वर मार्केट, शिवाजी महाराजांचा पुतळा, स्टेशन रोडची निर्मिती, सांगली पूल, पाणी योजनांसह अनेक प्रश्न मार्गी लागले. आजही त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. मात्र त्यानंतर झालेल्या शॉर्ट टर्म नगराध्यक्षांना केवळ नावापुढे माजी हा शब्द लावण्यापलीकडे कोणतीही लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही.काका गटाच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर दोन महिन्यांसाठी सुशिला साळुंखे यांची निवड झाली. आता बाबासाहेब पाटील यांना तीन महिन्यांसाठी नगराध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे, तर उर्वरित टर्ममध्ये आणखी दोन नगरसेवकांना संधी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच उर्वरित इच्छुक नगरसेवकांना नगराध्यक्षपद देण्यासाठी महिन्याऐवजी दिवसावर संधी दिली जाणार काय? असा खोचक सवालही जनतेतून विचारला जात आहे.