शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

तासगावात भाजपच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना घातले कोंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST

तासगाव : तालुक्यातील कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत ...

तासगाव : तालुक्यातील कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. गावच्या विकासावर परिणाम होत आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप करून संतप्त झालेल्या भाजपचे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी ग्रामपंचायत विभागाला टाळे ठोकले.

तीन विस्तार अधिकारी, एक ग्रामसेवक व एक शिपाई अशा पाच जणांना सुमारे तासभर कोंडून घातले. यामुळे काही काळ पंचायत समितीत तणाव निर्माण झाला. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत काम बंद करून गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. अखेर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.

कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक आपल्या कार्यालयात वेळेवर हजर नसतात. पंचायत समिती सदस्यांचा फोन उचलत नाहीत. वैद्यकीय रजा काढून इतरत्र फिरत असतात. त्यामुळे गावच्या विकासकामांवर, नागरिकांच्या विविध कामावर परिणाम होत आहे, असा आरोप करून आठवले यांनी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या; मात्र कारभारात सुधारणा होत नसल्यामुळे आठवले यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

विस्तार अधिकाऱ्यांना उद्देशून ''कवठेएकंद, नागाव (कवठे) येथे ग्रामसेवक शासकीय वेळेत उपस्थित नसतात. आमचा फोनही ते उचलत नाहीत. वैद्यकीय रजेचा अर्ज देऊन ते इतरत्र फिरत असतात. रजेच्या काळात गावाला दुसरा ग्रामसेवक मिळाला नाही. मी ग्रामपंचायत विभागाला कुलूप ठोकणार आहे'', असे सांगून सर्वांना कार्यालयाच्या बाहेर होण्यास सांगितले. तेथे बसलेल्या विस्तार अधिकारी पी. के. सुतार, ए. के. पाटील, के. आर. पाटील, ग्रामसेवक सुभाष शिंदे व शिपाई अभय शिंदे यांनी ''आम्ही शासकीय कर्मचारी आहोत. आम्ही कसे कार्यालय सोडून बाहेर जाणार. तुमचा जो काय विषय आहे तो गटविकास अधिकाऱ्यांशी बोला. आपण चर्चेने मार्ग काढू'', असे सांगितले. त्यानंतर आठवले यांनी या कार्यालयाला टाळे ठोकले.

याचवेळी सभापती शेंडगे पंचायत समितीत आले. त्यांच्या मध्यस्थीने कोंडून घातलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यानंतर उपसभापती डॉ. शुभांगी पाटील यांच्या दालनात गटविकास अधिकारी दीपा बापट, सदस्य आठवले यांच्यासह ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शेंडगे यांनी अधिकारी - पदाधिकारी यांच्यात समझोता घडवून वादावर पडदा टाकला.

चौकट

या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात प्रचंड गोंधळ झाला. गटविकास अधिकारी दीपा बापट याही आक्रमक झाल्या. सदस्यांचे हे वागणे बरोबर नाही. कोणत्याही विषयावर सदस्यांनी चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे, अशी भूमिका घेतली. याचवेळी पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व्हरांड्यात आले. आठवले यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.