शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

तासगावात विराट अंत्ययात्रा

By admin | Updated: February 18, 2015 01:19 IST

आबांना अखेरचा सलाम : जनसागराला अश्रू अनावर

तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तासगावात जमलेल्या अथांग जनसागराला अश्रू अनावर झाले. आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा तासगाव शहरातून काढण्यात आली. कार्यकर्त्यांसह, हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात ही अंत्ययात्रा निघाली. सोमवारी सायंकाळी आबांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर तासगाव तालुक्यावर शोककळा पसरली होती. मुंबईतून रात्री उशिरा निघालेले त्यांचे पार्थिव आज सकाळी पावणेआठ वाजता तासगावात पोहोचले. रात्रभर कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेची तयारी केली होती. शहरातील भिलवडी नाका परिरसरात सकाळी सहापासून कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. भिलवडी नाक्यावर फुलांच्या हारांनी सजविलेला ट्रक उभा करण्यात आला होता. आबांच्या पार्थिवाची वाट बघत कार्यकर्ते, नागरिक तेथे मोठ्या संख्येने उभे होते. सकाळी पावणेआठ वाजता रुग्णवाहिकेतून आबांचे पार्थिव आल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला शोक अनावर झाला. ‘आर. आर. आबा अमर रहे, परत याऽ परत याऽऽ..’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गर्दीमुळे सुरुवातीला बराच वेळ पार्थिव रुग्णवाहिकेतून बाहेर काढणे मुश्किल झाले होते. सजविलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवल्यानंतर अखेरची यात्रा सुरू झाली. बघता-बघता तासगावातील रस्ते गर्दीने खचाखच भरले होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. महिलांनीही रस्त्यावर येऊन अखेरचा निरोप दिला. शहरातील प्रत्येक इमारतीच्या छतावर नागरिक उभे होते. भिलवडी नाका, सिद्धेश्वर चौक, पोस्ट मार्गे गणपती मंदिर, गुरुवार पेठ, बसस्थानक चौक यामार्गे अंत्ययात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचली. बाजार समिती आवारातील आबांच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे नियोजनात असल्यामुळे नागरिकांनी आधीच तिथे मोठी गर्दी केली होती. गर्दी व वेळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे पार्थिव न ठेवण्याचा ऐनवेळी निर्णय घेण्यात आला. बाजार समिती आवारात महिलांनी, व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते. बाजार समितीमधून पार्थिव सावळजमार्गे अंजनीकडे रवाना झाले आणि तासगाव सुने-सुने झाले. (वार्ताहर)