शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

आटपाडीत मागणी करूनही टँकर मिळेनात

By admin | Updated: April 5, 2017 23:28 IST

तालुक्यामध्ये लाल फितीचा अजब कारभार : ग्रामस्थांची मात्र पाण्यासाठी भटकंती सुरू

अविनाश बाड ल्ल आटपाडीआटपाडी तालुक्यात अनेक गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करुन ३ महिने झाले, तरीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. बेफिकीर प्रशासन यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवित आहे. टँकरचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडून, अक्षम्य वेळकाढूपणा केला जात आहे. तालुकावासीयांची मात्र पिण्याच्या पाण्यासाठी उन्हा-तान्हात रानोमाळ भटकंती सुरु आहे. सध्या आटपाडी तालुक्यात ११ गावांसाठी टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा ३ फेब्रुवारी रोजी कौठुळी गावासाठी पहिला टँकर सुरु करण्यात आला. त्यानंतर भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), दिघंची, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, माडगुळे, देशमुखवाडी, बनपुरी, बोंबेवाडी, झरे आणि विभुतवाडी या गावांना टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तालुक्यातील १७,३०१ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहे. त्यासाठी सध्या ११ टँकरच्या २६ खेपा दररोज कागदोपत्री तरी केल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात किती खेपा होतात, हा चौकशीचा मुद्दा आहे. लोकांचे पाण्यासाठी अतोनात हाल सुरु असताना, प्रशासन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत किती दिरंगाई करतेय, हे विठलापूर गावाच्या प्रस्तावावरुन स्पष्ट होते. विठलापूर गावासाठी तालुक्यात दरवर्षी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. पण यंदा दि. २७ जानेवारी रोजी टँकरचा प्रस्ताव देऊनही आजअखेर तिथे टँकर सुरु करण्यात आलेला नाही. या गावात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. गेल्या ४ महिन्यांपासूनच तिथे आठवड्यातून एकदा पाणी मिळत होते. सध्या तिथे महिन्यातून एकदाही पाणी मिळत नाही. लोक उन्हा-तान्हात ३-४ कि.मी.ची भटकंती करुन पिण्याचे पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विठलापूरसह आणखी १३ गावांचे प्रस्ताव पाणी टंचाईच्या लाल फितीत अडकले आहेत. आधीच ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करण्यास वेळ लागतो. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांची संयुक्त पाहणी होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग प्रस्ताव तयार करतो. मग गटविकास अधिकाऱ्यांची सही होऊन तो तहसील कार्यालयाकडे पाठविला जातो. तिथून विट्याला प्रांताधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर परत याच कार्यालयांच्या मार्गे प्रस्तावाचा परतीचा प्रवास घडतो. त्यामुळे खूप वेळ लागत आहे. इकडे जीवघेण्या पाणीटंचाईने लोकांचे हाल सुरू आहेत. टंचाई जाहीर न झाल्याने सध्या जिल्हाधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार आहेत. पण आटपाडी तालुक्यात टंचाईची भीषण वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.