शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आटपाडीत मागणी करूनही टँकर मिळेनात

By admin | Updated: April 5, 2017 23:28 IST

तालुक्यामध्ये लाल फितीचा अजब कारभार : ग्रामस्थांची मात्र पाण्यासाठी भटकंती सुरू

अविनाश बाड ल्ल आटपाडीआटपाडी तालुक्यात अनेक गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करुन ३ महिने झाले, तरीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. बेफिकीर प्रशासन यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवित आहे. टँकरचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडून, अक्षम्य वेळकाढूपणा केला जात आहे. तालुकावासीयांची मात्र पिण्याच्या पाण्यासाठी उन्हा-तान्हात रानोमाळ भटकंती सुरु आहे. सध्या आटपाडी तालुक्यात ११ गावांसाठी टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा ३ फेब्रुवारी रोजी कौठुळी गावासाठी पहिला टँकर सुरु करण्यात आला. त्यानंतर भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), दिघंची, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, माडगुळे, देशमुखवाडी, बनपुरी, बोंबेवाडी, झरे आणि विभुतवाडी या गावांना टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तालुक्यातील १७,३०१ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहे. त्यासाठी सध्या ११ टँकरच्या २६ खेपा दररोज कागदोपत्री तरी केल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात किती खेपा होतात, हा चौकशीचा मुद्दा आहे. लोकांचे पाण्यासाठी अतोनात हाल सुरु असताना, प्रशासन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत किती दिरंगाई करतेय, हे विठलापूर गावाच्या प्रस्तावावरुन स्पष्ट होते. विठलापूर गावासाठी तालुक्यात दरवर्षी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. पण यंदा दि. २७ जानेवारी रोजी टँकरचा प्रस्ताव देऊनही आजअखेर तिथे टँकर सुरु करण्यात आलेला नाही. या गावात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. गेल्या ४ महिन्यांपासूनच तिथे आठवड्यातून एकदा पाणी मिळत होते. सध्या तिथे महिन्यातून एकदाही पाणी मिळत नाही. लोक उन्हा-तान्हात ३-४ कि.मी.ची भटकंती करुन पिण्याचे पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विठलापूरसह आणखी १३ गावांचे प्रस्ताव पाणी टंचाईच्या लाल फितीत अडकले आहेत. आधीच ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करण्यास वेळ लागतो. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांची संयुक्त पाहणी होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग प्रस्ताव तयार करतो. मग गटविकास अधिकाऱ्यांची सही होऊन तो तहसील कार्यालयाकडे पाठविला जातो. तिथून विट्याला प्रांताधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर परत याच कार्यालयांच्या मार्गे प्रस्तावाचा परतीचा प्रवास घडतो. त्यामुळे खूप वेळ लागत आहे. इकडे जीवघेण्या पाणीटंचाईने लोकांचे हाल सुरू आहेत. टंचाई जाहीर न झाल्याने सध्या जिल्हाधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार आहेत. पण आटपाडी तालुक्यात टंचाईची भीषण वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.