शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत मागणी करूनही टँकर मिळेनात

By admin | Updated: April 5, 2017 23:28 IST

तालुक्यामध्ये लाल फितीचा अजब कारभार : ग्रामस्थांची मात्र पाण्यासाठी भटकंती सुरू

अविनाश बाड ल्ल आटपाडीआटपाडी तालुक्यात अनेक गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करुन ३ महिने झाले, तरीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. बेफिकीर प्रशासन यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवित आहे. टँकरचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडून, अक्षम्य वेळकाढूपणा केला जात आहे. तालुकावासीयांची मात्र पिण्याच्या पाण्यासाठी उन्हा-तान्हात रानोमाळ भटकंती सुरु आहे. सध्या आटपाडी तालुक्यात ११ गावांसाठी टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा ३ फेब्रुवारी रोजी कौठुळी गावासाठी पहिला टँकर सुरु करण्यात आला. त्यानंतर भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), दिघंची, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, माडगुळे, देशमुखवाडी, बनपुरी, बोंबेवाडी, झरे आणि विभुतवाडी या गावांना टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तालुक्यातील १७,३०१ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहे. त्यासाठी सध्या ११ टँकरच्या २६ खेपा दररोज कागदोपत्री तरी केल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात किती खेपा होतात, हा चौकशीचा मुद्दा आहे. लोकांचे पाण्यासाठी अतोनात हाल सुरु असताना, प्रशासन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत किती दिरंगाई करतेय, हे विठलापूर गावाच्या प्रस्तावावरुन स्पष्ट होते. विठलापूर गावासाठी तालुक्यात दरवर्षी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. पण यंदा दि. २७ जानेवारी रोजी टँकरचा प्रस्ताव देऊनही आजअखेर तिथे टँकर सुरु करण्यात आलेला नाही. या गावात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. गेल्या ४ महिन्यांपासूनच तिथे आठवड्यातून एकदा पाणी मिळत होते. सध्या तिथे महिन्यातून एकदाही पाणी मिळत नाही. लोक उन्हा-तान्हात ३-४ कि.मी.ची भटकंती करुन पिण्याचे पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विठलापूरसह आणखी १३ गावांचे प्रस्ताव पाणी टंचाईच्या लाल फितीत अडकले आहेत. आधीच ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करण्यास वेळ लागतो. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांची संयुक्त पाहणी होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग प्रस्ताव तयार करतो. मग गटविकास अधिकाऱ्यांची सही होऊन तो तहसील कार्यालयाकडे पाठविला जातो. तिथून विट्याला प्रांताधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर परत याच कार्यालयांच्या मार्गे प्रस्तावाचा परतीचा प्रवास घडतो. त्यामुळे खूप वेळ लागत आहे. इकडे जीवघेण्या पाणीटंचाईने लोकांचे हाल सुरू आहेत. टंचाई जाहीर न झाल्याने सध्या जिल्हाधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार आहेत. पण आटपाडी तालुक्यात टंचाईची भीषण वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.